नवी दिल्ली : महामारीमुळे झालेली देशाची बिकट परिस्थिती पाहून जगभरातील भारतीय हळहळत आहेत. तसेच, गेल्या दीड वर्षांत ज्या भारतीय नागरिकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावलं आहे. त्यांच्या डोळ्यांत अजूनही आपल्या आप्तांच्या आठवणींनी पाणी गोळा होत आहे. मात्र, अजूनही देशातील महामारीची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचे आश्वासक चित्र दिसत नाहीये.
या पार्श्वभूमीवर, काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूर दृश्य प्रणालीद्वारे, आपल्या मतदारसंघातील (वाराणसी) काही डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्याशी चर्चा करत असताना, एकाएकी त्यांचा कंठ दाटून आला, ते भावुक झाले. अचानक बोलायचे थांबले. या प्रसंगानंतर त्यांनी स्वतःला सावरत ती बैठक पार पाडली. मात्र, आता यावरून देशभरातून मोदींवर टीका होत असून, आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी केलेला, यासंदर्भातील भविष्यवाणीचा एक व्हिडीओ कसा खरा ठरला असल्याची क्लिप देखील आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
जो 17 अप्रैल को बोला था
21 मई को सच हो गया।
देश को एक संवेदनशील नेक दिल इंसान चाहिये
ढोंगी प्रधानमंत्री नही जो खुद रैली करके कोरोना फैलाए और बाद में रोने का नाटक करे। pic.twitter.com/lDvQQmvlmw— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) May 21, 2021
संजय सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी, “पंतप्रधान मोदी देशातील महामारीच्या परिस्थितीसंदर्भात बोलताना टीव्हीवर येऊन रडतील, असं या व्हिडिओत म्हटल्याचं दिसत आहे. दरम्यान, आपल्या या भविष्यवाणीची आठवण सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून करून दिली असून, आपनं एक अधिकृत पत्रक याबाबत प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये सिंह यांनी पंतप्रधान मोदींबद्दल व्यक्त केलेली शक्यता खरी ठरल्याचं म्हटलं आहे.
तसेच, यानंतर स्वतः संजय सिंह यांनी देखील मोदींवर शुक्रवारी ट्विटरवरुन निशाणा साधत, ‘जे १७ एप्रिलला बोललो होतो, ते २१ मे रोजी खरं ठरलं. देशाला एका संवेदनशील आणि चांगल्या मनाची व्यक्तीची गरज आहे. असले ढोंग करणारे पंतप्रधान देशाला आता नको, यांनी स्वत: निवडणुकीदरम्यान प्रचारसभा घेऊन या रोगाचा प्रसार केला आणि आता हे रडण्याचं नाटक करत आहेत,’ या शब्दांत त्यांनी मोदींवर हल्लबोल केला आहे.
Read Also :
- देशात लसींच्या तुटवड्याला केंद्र सरकार जबाबदार- सिरम इन्स्टिट्यूट
- “सामना आला धावून”, आजच्या संपादकीय मधून चक्क पंतप्रधान मोदींची पाठराखण!
- ‘महाराष्ट्राने कधीही कोरोनाची आकडेवारी लपवली नसल्याने…’
- महाराष्ट्रात 1 जूननंतर लॉकडाउन पुन्हा वाढणार ? मुख्यमंत्री म्हणाले…
- ‘12 आमदारांच्या नियुक्त्या कधी करणार आहात ?’