मुंबई : देशातल्या सध्याच्या महामारीच्या परिस्थितीला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचे चित्र देशभरातल्या माध्यमांतून रंगवले जात आहे. काँग्रेसकडून देखील केंद्र सरकारवर आणि त्यातही प्रामुख्याने पंतप्रधान मोदींवर सातत्याने टीका केली जात आहे.
राज्यात देखील राष्ट्रीय राजकारणाला अनुसरून, सत्त्ताधारी पक्षातील नेते आणि मंत्री मिळून भाजपवर हल्लबोल करत आहेत. तसेच, सत्तेतल्या शिवसेना पक्षाची भूमिका मांडणाऱ्या, अर्थात शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या ‘सामना’मधून देखील, दररोज केंद्र सरकार टीकास्त्र डागले जात असून, पंतप्रधानांवर टीका केल्याच्या बातम्या दररोज इतर माध्यमांतून फिरताना आपल्याला पाहायला मिळतात.
मात्र, आजचे (शनिवार) चित्र आत्तापर्यंतच्या एकूण चित्रापेक्षा वेगळे असून, सामनाने आपल्या आजच्या अंकांच्या संपादकीय पानावर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कैातुक करणारा लेख छापला आहे. शिवाय आज “सामना” च्या पहिल्या पानावर ‘पंतप्रधान मोदी भावुक झाले ,वाराणसीतील डॉकटरांशी संवाद साधताना त्यांचा कंठ दाटला’ अशी बातमीही सामनामधून ठळकपणे प्रसिध्द केली गेली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात यावरून तर्क वितर्कांना पाय फुटले असून, या गोष्टीचा अर्थ लावायचा काय, असा एकंदरीत प्रश्न राजकीय नेत्यांना पडला आहे.
दरम्यान, आजच्या संपादकीय पानावर “पंतप्रधानांना दोषी का ठरवता” असे शीर्षक असलेला, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लिहिलेला लेख प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये, “पंतप्रधानांनी योग्य त्या सूचना सर्व राज्यांना पाठवल्या होत्या. केंद्र सरकार कधीच गाफील नव्हते, पंतप्रधान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सातत्याने संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेत होते. केंद्र सरकारने काळजी घेतली होती, तरीही ते एकटेच जबाबदार कसे,” असा प्रश्न या लेखातून टीकाकारांना त्यांनी विचारला आहे.
Read Also :
- राष्ट्रवादीच्या नेत्यानेच केली शिवसेना नेत्याच्या भ्रष्टाचारी पोलखोल; महाविकास आघाडीत फुट?
- “अजितदादा, तुमच्या तिघाडीतल्या बिघाडीत सामान्य जनतेची हेळसांड का करताय”
- “अन्यथा जयंत पाटल्यांच्या निवास्थानासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार” अतुल खुपसे
- ‘…अन्यथा कोकणवासीय ‘कोल्हापुरी चप्पल’ हातात घेऊन नवाब भाईंचं स्वागत करतील’
- ‘मुख्यमंत्री साहेब, चक्रीवादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग’