मुंबई : तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांची पाहणी केली. चक्रावादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या एका दिवसाच्या दौऱ्यावर आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. चक्रीवादळाला लाजवेल असा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा वेग होता, असा सणसणीत टोला आता मनसेने लगावला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर कोकण दौऱ्यावरून टीका केली आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरचं बेस्ट सीएम, असा जोरदार टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.
मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमचा अभिमान आहे, चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे तसे तुम्ही फिरलात. खरच BEST C M.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) May 22, 2021
मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर भाजपकडून देखील टीका केली जात आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ दर्शनाचा कार्यक्रम असल्याची टीका, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली.
दरम्यान, पंचनामे पूर्ण होताच मदतीबाबत निर्णय घेणार असून कोणत्या निकषावर मदत जाहीर करावी हे आढावा घेतल्यानंतरच ठरवणार आहे.” अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील आढावा बैठकीनंतर दिली.
Read Also :