मुंबई : गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात कोरोनारुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे, म्यूकरमायकोसीस रुग्ण देखील आता मोठ्या प्रमाणात आढू लागत आहे. यातच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्राने कधीही कोरोनारुग्णांची आकडेवारी लपवली नसल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्राने आजपर्यंत कधीही कोरोनाची आकडेवारी लपवली नसल्याचं स्पष्ट करत यामुळेच राज्याने देशपातळीवर उत्तम काम केल्याचे राजेश टोपे म्हणाले.
टेस्टिंग कुठे केल्या जातात हेही महत्त्वाचे आहे. लवकर निदान झाल्यामुळे उपचार लवकर मिळून मृत्यूदर कमी होण्यास मदत हाते. ग्रामीण आणि तालुकास्तरीय उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आयसीयू बेडची गरज आहे. शासन आगामी काळात त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देखील राजेश टोपे म्हणाले.
म्युकरमायकोसीस हा आजार आगामी काळात नोटीफाईड डिसीज ठरणार असल्याचे राजेश टोपे म्हणाले. गृह विलगीकरणाचे प्रमाण कमी करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर द्यावा, असेही ते म्हणाले.
Read Also :