मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. सोमवारपर्यंत (24 मे) अटक न करण्याच्या निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल केलेला गुन्ह्याच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत.
ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी परमबीर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीवर उच्च न्यायालयात ही सुनावणी पार पडली. मात्र, मात्र, मध्यरात्री 12 पर्यंतही सुनावणी पूर्ण होत नसल्याचे पाहून खंडपीठाने अखेरीस पुढील सुनावणी सोमवारी ठेवली आणि तोपर्यंत परमबीर यांच्यावर अटकेची कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश दिला आहे.
न्या. काथावाला व न्या. तावडे यांच्या खंडपीठाने सलग विक्रमी १३ तास काम केले. रात्री उशिरा परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू झाली. मात्र, सुनावणी पूर्ण होत नसल्याचे पाहून अखेर न्यायायालने अंतरिम आदेश देत सुनावणी पुढे ढकलली.
‘त्या’ पत्रानंतरच परमबीर यांच्याविरोधात एकापाठोपाठ एक गुन्हे कसे दाखल झाले?, असा सवाल देखील यावेळी न्यायालयाने सरकारला विचारला. यावर हा कोणत्याही सूडबुद्धीतून केलेला नाही. राज्याच्या गृहमंत्रालयावर आणि अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले म्हणून हा गुन्हा दाखल केला नाही, अशी भूमिका राज्य सरकारने मांडली.
Read Also :