मुंबई : महामारीच्या या दुसऱ्या लाटेनं राज्यात निर्माण झालेली भीषण परिस्थिती आटोक्यात यावी, म्हणून राज्यात नाईट कर्फ्यू, संचारबंदी आणि लॉकडाउन अशा उपायांची टप्प्या टप्प्याने अंमलबजावणी करत १४ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन जारी करण्यात आला, या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना, नवाब मलिक यांनी केलेल्या एका विधानावर सवाल उठवून भाजपने राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी नवाब मलिक यांचा हा व्हिडीओ ट्विट करत शेअर केला असून, नवाब मलिक आपल्याच तोंडाने आपल्याच अपयशाचे गोडवे गाण्यासाठी हिंमत लागते. चाचण्या वाढविल्यामुळे करोना संख्या वाढून सरकारची बदनामी होत असल्याचा सल्ला देणारे पत्रकार आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालणारे राज्य सरकार असे एकाच दगडात दोन पक्षी मारणारे मलिक कुणाची बदनामी करत आहेत? हा तर आपल्याच सरकारला दिलेला घरचा आहेर आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे.
हा तर आपल्याच सरकारला दिलेला घरचा आहेर आहे.
नवाब मलिक महाराष्ट्राचे कोरोनाचे आकडे कमी दिसावेत म्हणून टेस्ट कमी केल्याची लोकांची शंका जुनीच आहे. तुमचे हे वक्तव्य त्याची कबुली दिसते. खरे काय ते सांगा. उगाच पत्रकारांच्या मागे लपू नका. सरकार पत्रकार चालवतात का ?..३— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 22, 2021
तसेच, “नवाब मलिक महाराष्ट्राचे कोरोनाचे आकडे कमी दिसावेत म्हणून टेस्ट कमी केल्याची लोकांची शंका जुनीच आहे. तुमचे हे वक्तव्य त्याची कबुली दिसते. खरे काय ते सांगा. उगाच पत्रकारांच्या मागे लपू नका. सरकार पत्रकार चालवतात का? महाराष्ट्रात देशांतील सर्वाधिक कोरोनामृत्यू झाले त्याचेही कारण संख्या कमी दिसण्यासाठी कमी केलेले टेस्टिंग आहे का? नवाब मलिक प्रकरण गंभीर आहे. मुख्यमंत्री महोदय नवाब मलिक यांची चौकशी करा,” अशी मागणी देखील केशव उपाध्ये यांनी केली आहे.
महाराष्ट्रात देशांतील सर्वाधिक कोरोनामृत्यू झाले त्याचेही कारण संख्या कमी दिसण्यासाठी कमी केलेले टेस्टिंग आहे का? नवाब मलिक प्रकरण गंभीर आहे. मुख्यमंत्री महोदय @OfficeofUT चौकशी करा.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 22, 2021
दरम्यान, उपाध्येंनी ट्विट केलेला हा व्हिडीओ आज तक या वृत्तवाहिनीचा असून, या वृत्तवाहिनीशी बोलताना नवाब मलिक यांनी, “पहिल्या दिवसांपासून आम्ही चाचण्यांचं प्रमाण वाढवलं होतं. त्यावेळी आम्हाला पत्रकारांचे फोन येत होते की, चाचण्या कमी करा. रुग्णसंख्येचा आकडा वाढतोय. तुमची बदनामी होत आहे…”, असं मलिक म्हणत असल्याचं स्पष्ट ऐकू येत आहे.
Read Also :