मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसपाठोपाठ आता म्युकरमायकोसीस आजाराचे संकट निर्माण झाले आहे. या संकटात देखील विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे दिसत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील विरोधक हे ब्लॅक फंगस आहे, अशी टीका केली होती. या टीकेला आता भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. विरोधक ब्लॅक फंगस आहेत, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात कडी लावून बसतात का ? असा खोचक सवाल त्यांनी संजय राऊंताना केला.
बोरूबहाद्दर म्हणतायत विरोधक ब्लॅक फंगस आहेत.
अच्छा, म्हणून मुख्यमंत्री @OfficeofUT
कायम कडी लावून आणि दडी मरून घरी बसलेले असतात का?लोक लाजेपायी दौऱ्यावर गेले तरी धावतपळत जेवायला घरीच येतात का?
काय निधड्या छातीचे सत्ताधारी मिळालेत महाराष्ट्राला…
#mahavasooliaaghadi pic.twitter.com/Ow5M0zweJN— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 22, 2021
बोरूबहाद्दर म्हणतायत विरोधक ब्लॅक फंगस आहेत. अच्छा, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायम कडी लावून आणि दडी मरून घरी बसलेले असतात का? लोक लाजेपायी दौऱ्यावर गेले तरी धावतपळत जेवायला घरीच येतात का? काय निधड्या छातीचे सत्ताधारी मिळालेत महाराष्ट्राला, अशी सणसणीत टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत ?
कोरोना उद्रेकाळाच्या काळात मुंबईत चांगलं काम झालं आहे. या कामाची दखल जागतिक आरोग्य संघटना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली. तरी देखील विरोधक टीका करत आहेत. या टीकेकडे शिवसैनिकांनी दुर्लक्ष करून कामावर लक्ष केंद्रित करावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली होती.
Read Also :
- पुणे महापालिका लसीसाठी ग्लोबल टेंडर काढणार, मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- पीक विम्याच्या प्रश्नी उच्च न्यायालयात जाणार – राणाजगजितसिंह पाटील
- ‘राज्यपालांनी ठराविक दिवसांत आमदारांची नियुक्ती करावी, असं काही बंधन नाही’
- ‘हे अख्ख सरकारच जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना’
- शरद पवारांचे उदाहरण देत चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, म्हणाले…