मुंबई : कोरोना व्हायरस महामारीमुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. लसीकरणाचा वेग देखील मंदावला आहे. हजारो लोकांन आपले प्राण गमवावे लागत आहे. यावरून आता पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी याही परिस्थितीत सांगितले की, आज निवडणुका घेतल्या तरी भाजपाला 400 जागा मिळतील. यावर निखिल वागळे यांनी त्यांना चांगले उत्तर दिले आहे. आधी गंगेतून वाहून आणलेले मृतदेह उचला, मग निवडणुकांचं बघू! लोकांचे जगण्याचे आणि मरण्याचेही वांधे झाले आहेत आणि हे महाशय म्हणतात, चारशे जागा जिंकू. (कोठून आणतात हे इतका आत्मविश्वास?) देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण फाजिल आत्मविश्वासाचे फुगे उंच हवेत उडत आहेत, अशा शब्दात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर राऊत यांनी निशाणा साधला आहे.
हिंदुस्थानातील गोमूत्र प्राशनावर रशियासह अनेक देशांतील वृत्तपत्रांनी आपली चेष्टा केली आहे. गंगेत जे हजारो कोरोनाग्रस्त मृतदेह सोडून दिले व त्यांच्यावर धड अंत्यसंस्कारही होऊ शकले नाहीत, त्यांच्यापर्यंत हा गोमूत्र संदेश गेला असता तर त्यांना गंगेत फेकून देण्याची वेळ आली नसती. गंगेत तरंगणाऱया शेकडो प्रेतांनी हिंदुस्थानचा भेसूर चेहरा जगासमोर आणल, असे संजय राऊत म्हणाले.
‘पंतप्रधान मोदी हे लस बनवणाऱ्या फॅक्टऱ्यात जाऊन आले. त्याने काय साध्य झाले? अमेरिकेसह अनेक राष्ट्रांनी हिंदुस्थानातील लस उत्पादक कंपन्यांना आधीच ‘मोठी’ ऑर्डर देऊन ठेवली होती. त्यामुळे हिंदुस्थानात बनलेली ही लस आधी मोठय़ा प्रमाणावर परदेशात पोहोचली व हिंदुस्थानात प्रेतांचे खच पडले. मुडदे गंगेत तरंगत राहिले. ‘मोदीजी, आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली?’ हा प्रश्न त्यामुळे चुकीचा ठरत नाही.’
राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रूपात वाहताना आणि तरंगताना आपण पाहिला. यावर जे बोलतील ते आता राष्ट्रद्रोही ठरतील. संपूर्ण जग कोरोनाशी लढण्याची रणनीती ठरवण्यात गुंतले असताना आमच्या देशाचे नेतृत्व निवडणूक जिंकण्याची रणनीती ठरवण्यात गुंतून पडले, अशी टीका त्यांनी केली.
गंगा ही पापाच्या शुद्धीकरणासाठी होती. आज गंगेचा प्रवाह पाप लपवायला आणि धुवायला तयार नाही. राजकारणाच्या गुडघ्यातून मान बाहेर काढून या प्रश्नांकडे जे पाहतील त्यांनाच सभोवतालचे सत्य दिसेल. नाहीतर गंगेत तरंगणाऱया पापांचे मालक म्हणून समोर या; सत्य स्वीकारा, असेही ते म्हणाले.
Read Also :
- ‘महाविकास आघाडीच्या नावानेच महाराष्ट्राला मागच्या दीड वर्षापासून ब्लॅक फंगसची लागण’
- ‘…म्हणून मुख्यमंत्री कायम कडी लावून आणि दडी मरून घरी बसलेले असतात का?’
- पुणे महापालिका लसीसाठी ग्लोबल टेंडर काढणार, मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- पीक विम्याच्या प्रश्नी उच्च न्यायालयात जाणार – राणाजगजितसिंह पाटील
- ‘राज्यपालांनी ठराविक दिवसांत आमदारांची नियुक्ती करावी, असं काही बंधन नाही’