मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीतील काही भागांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे हे कोकण दौऱ्यावर आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्य दौऱ्यावरून भाजप नेत्यांकडून सातत्याने टीका केली जात आहे. आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ‘कोकणात वादळ चार तास थांबलं. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन तासही थांबले नाहीत’, अशा शब्दात टीका केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचा तीन दिवस 700 किलोमीटरचा दौरा केला. अनेक गावांमध्ये जाऊन नुकसानग्रस्त लोकांची भेट घेतली. मच्छिमारांशी, बगायतदारांशी संवाद साधला. त्यांच दु:ख समजून घेत मदतीचा विश्वासही आम्ही त्यांना दिला. परंतु राज्याचे मुख्यमंत्री तीन तास सुद्धा कोकणात फिरू शकले नाहीत, अशी जोरदार टीका प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केली.
सरकारच्या जनतेबाबत, कोकणवासीयांबाबत काय संवेदना आहेत हे दिसून येते. वादळापेक्षा जास्त वेग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. वादळ 4 तास थांबले होते. परंतु, मुख्यमंत्री केवळ 3 तास सुद्धा थांबू शकले नाहीत, हे राज्याचे दुर्दैव आहे, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला.
पंचनाम्याच्या नावाने कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या महाविकास आघाडी सरकारने केलं आहे, अशी टीका देखील प्रवीण दरेकरांनी सरकारवर केली.
Read Also :
- ‘मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी झाली’
- ‘गंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांनी हिंदुस्थानचा भेसूर चेहरा जगासमोर आणला’
- ‘महाविकास आघाडीच्या नावानेच महाराष्ट्राला मागच्या दीड वर्षापासून ब्लॅक फंगसची लागण’
- ‘…म्हणून मुख्यमंत्री कायम कडी लावून आणि दडी मरून घरी बसलेले असतात का?’
- पुणे महापालिका लसीसाठी ग्लोबल टेंडर काढणार, मुरलीधर मोहोळ यांची माहिती