मुंबई : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात एप्रिल महिन्यापासून कडक निर्बंध लागू आहेत. गेल्या काही दिवसात वाढलेली कोरोनारुग्णांची संख्या देखील आता कमी होतोना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘राज्याच्या हितासाठी कटूपणा घ्यायची माझी तयारी’, असे वक्तव्य करत लॉकडाऊनसंदर्भात सूचक वक्तव्य केले आहे.
राज्यात 1 जूननंतर देखील लॉकडाऊन वाढणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे. यातच आता मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारचे सूचक वक्तव्य केले आहे. ‘लॉकडाऊन लावण्याचा निर्णय अत्यंत कठोर आणि कटू असतो. आपल्या हालचालींवर बंधनं टाकणं आणि तीसुद्धा रोजीरोटीवर बंधनं टाकणं याच्यासारखा कठोर निर्णय किंवा शिक्षा असूच शकत नाही. ही सुरुवात कुणी करायची, असा एक प्रश्न होता. करोना संसर्ग उच्चांक गाठत असताना देशभरात भीतीचं वातावरण होतं पण मी ठामपणे लॉकडाऊनचा निर्णय घेतला. राज्याच्या हितासाठीच मी हे पाऊल उचललं. राज्याच्या हितासाठी कटूपणा घ्यायची माझी तयारी आहे, असे मी नेहमी सांगतो आणि त्यानुसार मला हा निर्णय घ्यावा लागला.’, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स स्थापन करण्यात आला आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्स बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससह राज्यातील बालरोग तज्ञांना मार्गदर्शन केले.
माझे कुटुंब, माझी जबाबदारीची व्याप्ती वाढली आहे. घरीच कोणतंही औषध देऊ नये- डॉक्टरांचा सल्ला घ्या. लहान मुलांच्या पालकांनी घाबरु नये, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
Read Also :
- ‘कोकणात वादळ 4 तास थांबलं, मुख्यमंत्री 3 तासही थांबले नाहीत’
- ‘मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी झाली’
- ‘गंगेत तरंगणाऱ्या शेकडो प्रेतांनी हिंदुस्थानचा भेसूर चेहरा जगासमोर आणला’
- ‘महाविकास आघाडीच्या नावानेच महाराष्ट्राला मागच्या दीड वर्षापासून ब्लॅक फंगसची लागण’
- ‘…म्हणून मुख्यमंत्री कायम कडी लावून आणि दडी मरून घरी बसलेले असतात का?’