मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण राबवला जाणार असल्याची माहिती दिली आहे. सर्वात प्रथम कोरोना योद्धांना लस दिली जाणार आहे. मात्र त्याआधी अनेक राजकीय नेत्यांकडून सर्वात प्रथम पंतप्रधान मोदींनी लस टोचून घ्यावी अशी मागणी केली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील सर्वात प्रथम पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंन लस टोचून घ्यावी, अशी मागणी केली आहे.
कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे.पण या लसीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत.यामुळे सर्वप्रथम पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी टीव्हीवर लाईव्ह येऊन सर्वांसमोर ही लस टोचून घ्यावी.त्यानंतर मी ती स्वतः घ्यायला तयार आहे.यामुळे लोकांना प्रोत्साहन मिळेल.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) January 11, 2021
प्रकाश आंबेडकरांनी ट्विट केले की, कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होत आहे. पण या लसीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामुळे सर्वप्रथम पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी टीव्हीवर लाईव्ह येऊन सर्वांसमोर ही लस टोचून घ्यावी. त्यानंतर मी ती स्वतः घ्यायला तयार आहे. यामुळे लोकांना प्रोत्साहन मिळेल.
दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात आधी लस टोचावी, अशी मागणी केली आहे.
Read Also :
- ‘आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस, गोड चहा घ्यायचा सोडा’, खोत यांचा शेट्टींना टोला
- ‘तुझी लायकी मातोश्रीचे बिस्कीट चोरायच्या पलीकडे नाही’, राणेंचा विनायक राऊतांवर हल्लाबोल
- आरक्षणाविषयी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, अशोक चव्हाणांची माहिती
- बर्ड फ्लूसंदर्भात गैरसमज व अफवा पसरवू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
- केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नीचा मृत्यू