ठाणे : दिल्लीच्या सीमेवर दीड महिन्यापासून कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहे. महाराष्ट्रातून देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर जोरदार हल्ला चढवला आहे.
एकीकडे सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या सोबत राहून आमदारकीसाठी बारामतीला जाऊन आमरस, गोड चहा घ्यायचा, अशी दुटप्पी भूमिका काहीजण घेत आहे, अशी नाव घेता बोचरी टीका खोत यांनी राजू शेट्टींवर केली आहे. ते ठाण्यात बोलत होते.
एका बाजूला सत्तेत राहून आंदोलन करायचे आणि दुसऱ्या बाजूला कारखाना मालकांच्या मांडीला मांडी लावून बसायचे हे उद्योग बंद करा. खोटे बोलून फक्त आमदारकी मिळाली यासाठीचे प्रयत्न शेतकऱ्यांना दिसत आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.
अजून किती दिवस साखरेचा गोड चहा घेत राहणार, किती दिवस आमरस खात राहणार, आता हे सर्व सोडून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे उद्योग बंद करा, अशी जोरदार टीका खोत यांनी नाव न घेता राजू शेट्टींवर केली आहे.
Read Also :
- ‘तुझी लायकी मातोश्रीचे बिस्कीट चोरायच्या पलीकडे नाही’, राणेंचा विनायक राऊतांवर हल्लाबोल
- आरक्षणाविषयी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार, अशोक चव्हाणांची माहिती
- बर्ड फ्लूसंदर्भात गैरसमज व अफवा पसरवू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
- केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात; पत्नीचा मृत्यू
- … त्यावेळी फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते, विनायक राऊतांचा दावा