सिंधुदुर्ग : भाजप नेते नितेश राणेंनी एका व्यक्तीला 12 कोटींचां गंडा घातला असून, यामुळे त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना तुरुंगात टाकणार होते, असा दावा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.
नितेश राणेंनी नवी मुंबईतील एका व्यक्तीला 12 कोटींचा गंडा घातला होता. या गुन्ह्याप्रकरणी फडणवीस हे नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते, असा दावा राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात टीव्ही9 मराठीने वृत्त दिले आहे.
नारायण राणे भाजपला शरण आल्याने ही केस बंद झाली. आम्ही मनात आणले तर ही केस लगेच ओपन करू शकतो. केस ओपन झाले तर राणे लगेच तुरुंगात जातील, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
राणेंच्या मेडिकल कॉलेजला फडणवीस यांनी अखेरपर्यंत परवानगी दिली नाही म्हणून राणे दोन महिन्यांपूर्वी मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते, असा दावा देखील विनायक राऊत यांनी केला आहे.
Read Also :
- … नाहीतर शिवसेनेने काँग्रेसच्या पेकाटात लाथ घातली पाहिजे – आशिष शेलार
- मोशीतील कचरा डेपो ‘बायोमायनिंग’च्या निविदा प्रक्रियेत राष्ट्रीय, राज्यस्तरावरील नेते इच्छूक
- ‘माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज्य सरकार जबाबदार’
- मला काहीही तक्रार नाही, मी विना सुरक्षेचा देखील फिरत राहणार – फडणवीस
- ‘हा बेशरमपणाचा कळस’, भंडारा दुर्घटनेनंतर सामनातून केंद्र-भाजपवर निशाणा