मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत राज्य सरकारने कपात केली आहे. यावरून राजकारण सुरू झाले असून, भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे.
सरकारच्या या निर्णयानंतर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझी याबाबत माझी काहीही तक्रार नसून, मी जनतेचा प्रतिनिधी आहे व विना सुरक्षेची देखील मी फिरू शकतो.
मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा सुरक्षा घेतली. मी भाजप प्रदेश अध्यक्ष होतो त्यावेळीही सुरक्षा घेतली नव्हती. याकूब मेननच्या फाशीनंतर आणि नक्षलवादी कारवायांनंतर केंद्राच्या सांगण्यावरुन माझी सुरक्षा वाढवण्यात आली होती. या सरकारला असं वाटत असेल की आता सुरक्षेची गरज नाही. मला सुरक्षेची गरज नाही, मी फिरत राहणार, असे फडणवीसांनी म्हटले आहे.
परसेप्शनवर सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला जातो. मला चिंता नाही, आता राजकीय निर्णय केले जात आहेत. माझी कुठलीही तक्रार नाही, मी जनतेतला माणूस आहे, त्यामुळं माझ्या फिरण्यावर काहीही फरक पडणार नाही, असेही ते म्हणाले.
तर, दुसरीकडे राज ठाकरे यांची सुरक्षा कमी केल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंंना पाकिस्तानी दहशतवाद्यांपासून धोका असल्याचे म्हटले आहे.
Read Also :
- ‘हा बेशरमपणाचा कळस’, भंडारा दुर्घटनेनंतर सामनातून केंद्र-भाजपवर निशाणा
- ‘सरकारचे आभार! आता राज्य सरकारने हीच सुरक्षा महिलांना द्यावी’
- ‘सत्तारांचे केसच उगवू देणार नव्हतो, पण आता त्यांना टोपी काढू देणार नाही’
- … तर त्या फोनवाल्या व्यक्तीकडे मी बघतोच – अजित पवार
- … म्हणून ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट कायमस्वरूपी केले बंद
- भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश