पुणे : खासदार रावसाहेब दानवे यांना पराभूत केल्याशिवाय डोक्यावरील टोपी काढणार नाही, असे खुले आव्हान ग्रामपंचायत निवडणुकीच्या धुरळ्यात शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली होती. सत्तार यांच्या या आव्हानाला आता दानवे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.
खरं तरं सत्तारांचे केसच उगवू देणार नव्हतो, पण आता त्यांना टोपी काढू देणार नाही, असा मिश्किल टोले दानवे यांनी सत्तारांना लगावला आहे.
अब्दुल सत्तार यांचं पहिले वक्तव्य होते की, रावसाहेब दानवे पडल्याशिवाय डोक्यात केस उगवू देणार नाही. आता पण केलाय टोपी घालणार नाही. अब्दुल सत्तार हे माझे चांगले मित्र आहेत. बिचारे बोलतात, पण निवडणूक आली, तर माझंच काम करतात, असा चिमटा दानवेंनी काढला. ते लोणावळ्यात बोलत होते.
ते आमचे मित्र आहेत. त्यांच्या तालुक्यात माझी आणि माझ्या तालुक्यात त्यांची सासुरवाडी आहे. पण मी त्यांची टोपी कधीच निघू देणार नाही. चिंता करू नका. त्यांची टोपी कधीच निघू देणार नाही! खरं तर केसच उगवू देणार नव्हतो, असा मजेशीर टोला देखील त्यांनी लगावला.
Read Also :
- फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या सुरक्षेची गरज नाही – गिरीश बापट
- सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर मनसे नेते संतापले
- ‘या’ राज्यातील निवडणुकांवर रामदास आठवलेंचा डोळा, 10 जागा लढवणार
- सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर मनसे नेते संतापले
- … तर त्या फोनवाल्या व्यक्तीकडे मी बघतोच – अजित पवार
- … म्हणून ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट कायमस्वरूपी केले बंद