सातारा : राज्य सरकारने विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे.
राज्यातील भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेत सरकारने कपात केली आहे. यावर बोलताना फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या सुरक्षेची गरज नाही, असा टोला भाजप खासदार गिरीश बापट यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. ते सातारा दौऱ्यावर असताना बोलत होते.
गिरीश बापट म्हणाले की, देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या सुरक्षेची गरज नाही. कार्यकर्ता हाच आमचा संरक्षक आहे. संघटनेचे, पक्षाचे त्यांनी कवच आहे. सरकारला काय निर्णय घ्यायचा तो घेऊद्या.
या दौऱ्यात गिरीश बापट यांनी जिल्ह्याचा तालुकानिहाय ग्रामपंचायत निवडणुकीचा आढावा घेतला. याबाबत ते म्हणाले की, सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रभावीपणे उतरली असून अनेक ठिकाणी आमचे सदस्य बिनविरोध आलेले आहेत.
Read Also :
- सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर मनसे नेते संतापले
- ‘या’ राज्यातील निवडणुकांवर रामदास आठवलेंचा डोळा, 10 जागा लढवणार
- सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर मनसे नेते संतापले
- … तर त्या फोनवाल्या व्यक्तीकडे मी बघतोच – अजित पवार
- … म्हणून ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट कायमस्वरूपी केले बंद
- भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश