गुवाहाटी : या वर्षाखेर देशभरातील 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. यामध्ये आसामचा देखील समावेश आहे. आसाममध्ये एप्रिल 2021 मध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. येथे प्रमुख लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये असली तरी आता रामदास आठवलेंचा आरपीआय हा पक्ष देखील येथे मैदानात उतरणार आहे.
गुवाहाटीच्या दौऱ्यावर असताना रामदास आठवले यांनी आसामच्या आगामी आसामच्या विधानसभा निवडणुकीत आरपीआय दहा जागा लढणार असल्याची घोषणा केली.
गेल्या निवडणुकीत भाजपला या राज्यात बहुमत मिळाले होते. आता आठवलेंनी या निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करणार असल्याचे म्हटले आहे. आसामच्या आगामी विधानसभा निवडणुकीत आरपीआय दहा जागांवर आपले उमेदवार उभे करेल. एनडीएचा मित्रपक्ष असल्याने आरपीआय लवकर राज्यातील युतीबाबत भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बातचित करेल, असे म्हणाले.
तसेच, या वर्षी होणाऱ्या निवडणुकीत सर्बानंद सोनोवाल नक्की पुन्हा मुख्यमंत्री होतील. माझ्या आरपीआय पक्षाचा त्यांना पाठिंबा असेल, असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला.
Read Also :
- सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर मनसे नेते संतापले
- … तर त्या फोनवाल्या व्यक्तीकडे मी बघतोच – अजित पवार
- … म्हणून ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट कायमस्वरूपी केले बंद
- भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश
- मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय पुढील आठवड्यात ? राज्य सरकारचे संकेत
- धक्कादायक! भंडाऱ्यात सरकारी रुग्णालयात आग लागल्याने 10 बाळांचा मृत्यू