मुंबई : राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर या भाजप नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सुरक्षेत घट केली आहे. फडणवीस, राज ठाकरे यांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ वाहन काढण्यात आलं आहे. मात्र राज ठाकरे यांची सुरक्षा कमी केल्याने मनसे नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढणे हा सरकारचा निर्णय खुजेपणा असल्याची टीका त्यांनी केली आहे.
सरकार कोणाचे हि असो वास्तवाचे भान ठेवुन असे निर्णय घ्यायला हवे. राज्यातील जनतेसाठी सतत उपलब्ध असणारा नेता , स्वतःच्या पक्षाचा फायदा नुकसान याचा विचार न करता स्पष्ट भूमिका घेणारा नेता , सामान्य लोकांच्या भल्यासाठी अनेकांशी भिडणारा नेता म्हणून राजसाहेब पूर्ण राज्याला माहीत आहे. साहेबांच्या रोख ठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू साहेबांबद्दल वैर बाळगून आहेत, असा आरोप त्यांनी नांदगावकरांनी केला.
साहेबांच्या एका आवाजावर अनेक सामान्य लोकांना संरक्षण देणारे हजारो महाराष्ट्र सैनिक या राज्यात आहेत. सरकार दरबारी जी कामे होत नाही किंवा ज्या विषयांना मतपेटी साठी टाळले जाते असे अनेक विषय राज दरबारी निकालात निघतात. साहेबांच्या जीवाला आपल्या देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून तर पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका असल्याचे आपण जाणूनच आहोत. तरी त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे “खुजेपण” ठळकपणे दाखविणारा आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली.
चीड या गोष्टीची येते की यात ज्यांना नव्याने सुरक्षा देण्याचा अथवा ज्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे या यादीतील काही नावे बघितल्यास एकच प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? सरकारने ज्या नवीन लोकांना सुरक्षा देण्याचे तसेच सुरक्षा वाढविण्याचे ठरविले त्यापेक्षा तोच पैसा आरोग्य व्यवस्था विकासासाठी वापरला असता तर अतिशय चीड आणणारी भंडारा जिल्ह्यातील 10 बाळांचा जीव घेणारी घटना टाळता आली असती, असे नांदगावकर म्हणाले.
Read Also :
- … तर त्या फोनवाल्या व्यक्तीकडे मी बघतोच – अजित पवार
- … म्हणून ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट कायमस्वरूपी केले बंद
- भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश
- मुंबई लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय पुढील आठवड्यात ? राज्य सरकारचे संकेत
- धक्कादायक! भंडाऱ्यात सरकारी रुग्णालयात आग लागल्याने 10 बाळांचा मृत्यू
- ‘अशोक चव्हाण यांचे मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे अज्ञान’