सिंधुदुर्ग : मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्तांची नियुक्ती करावी, अशी मागणी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली होती. मात्र शेख यांच्या मागणीनंतर भाजपकडून काँग्रेस आणि शिवसेनेवर निशाणा साधण्यात आला आहे.
शिवसेनासोबत सत्तेत बसलेल्या काँग्रेसच्या मंत्र्याने आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबई महापालिका विभाजनाची मागणी केली आहे. मुंबईला विभाजीत करण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना शिवसेनेची मुक संमती असल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.
शिवसेनेची भूमिका ताठर असेल संयुक्त मुंबई, एकसंघ मुंबई अशी असेल तर त्यांनी काँग्रेसला खडेबोल सुनावले पाहीजे, नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घातली पाहीजे. मुंबई तोडण्याचा प्रयत्न असेल, तर भाजप दोघांच्या विरोधात आंदोलन करेल, असा इशारा देखील शेलार यांनी दिला.
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्तांची नियुक्ती करावी, अशी मागणी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली होती. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी दोन स्वतंत्र पालकमंत्री आणि दोन स्वतंत्र जिल्हाधिकारी आहेत. ‘जर दोन पालकमंत्री आणि दोन जिल्हाधिकारी असूनही मुंबईचे विभाजन होत नसेल तर मुंबईसाठी दोन आयुक्त नेमणे हा मुंबई विभाजनाचा डाव कसा काय ठरु शकतो..?, असा सवाल शेख यांनी केला.
Read Also :
- मोशीतील कचरा डेपो ‘बायोमायनिंग’च्या निविदा प्रक्रियेत राष्ट्रीय, राज्यस्तरावरील नेते इच्छूक
- ‘माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज्य सरकार जबाबदार’
- मला काहीही तक्रार नाही, मी विना सुरक्षेचा देखील फिरत राहणार – फडणवीस
- ‘हा बेशरमपणाचा कळस’, भंडारा दुर्घटनेनंतर सामनातून केंद्र-भाजपवर निशाणा
- ‘सरकारचे आभार! आता राज्य सरकारने हीच सुरक्षा महिलांना द्यावी’