रत्नागिरी : राज्य सरकारने माझ्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. त्यामुळे जर माझ्या जिवाला धोका निर्माण झाला तर त्याला राज सरकार जबाबदार असेल, असे भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. ठाकरे सरकारने भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. या नेत्यांमध्ये नारायण राणे यांचा देखील समावेश आहे.
ठाकरे सरकारने विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नारायण राणे म्हणाले की, राज्य सरकारने माझी सुरक्षा काढून घेतली याबद्दल माझी कोणतीच तक्रार नाही. माझ्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. पण माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल. ते रत्नागिरीत बोलत होते.
राज्याकडून सुरक्षा कपात करण्यात आली असली तरी केंद्राकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्याला सुरक्षा पुरवली आहे. माझ्या सुरक्षेची जबाबदारी केंद्राने घेतली असल्याचेही ते म्हणाले.
Read Also :
- मला काहीही तक्रार नाही, मी विना सुरक्षेचा देखील फिरत राहणार – फडणवीस
- ‘हा बेशरमपणाचा कळस’, भंडारा दुर्घटनेनंतर सामनातून केंद्र-भाजपवर निशाणा
- ‘सरकारचे आभार! आता राज्य सरकारने हीच सुरक्षा महिलांना द्यावी’
- ‘सत्तारांचे केसच उगवू देणार नव्हतो, पण आता त्यांना टोपी काढू देणार नाही’
- … तर त्या फोनवाल्या व्यक्तीकडे मी बघतोच – अजित पवार