मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. त्यामुळे विरोधकांनी पहिल्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी मागणी केली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यपालांविरोधात शीर्षासन केले.
ऑपरेशन गंगा अभियानावर राजकारण करण्याची गरज नाही; शिवसेनेला परराष्ट्र राज्य मंत्र्याचा टोला
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. यावेळी दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा द्या. महाराष्ट्राचे सरकार दाऊद समर्थक आहे का? नवाब मलिक हाय हाय अशी जोरदार घोषणाबाजी करीत विधानभवनाच्या पायऱ्यावरच भाजपने आंदोलन सुरू केले आहे.
धनगर समाज, यशवंत ब्रिगेडचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला; ‘या’ प्रमुख मागण्यांचा केला पाठपुरावा
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यापालांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला. विधान परिषदेमधील बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय दौंड यांनी खाली डोकं वर पाय करत राज्यपालांच्या विरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर शीर्षासन केले. तर तिकडे भाजप नेते किरीट सोमय्या देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण आता चांगलचं तापलं जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापुर्वी झालेल्या चहापाण्याच्या कार्यक्रमाला देखील भाजपने बहिष्कार टाकला. तसेच यावेळी अधिवेशन पंधरा दिवसापेक्षा अधिक दिवस चालणार असल्याने जास्तीत जास्त प्रश्न उपस्थित करणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आगामी दिवसात राज्यात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार, याकडे लक्ष आहे.
Read also:
- नुसती उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करू नका; अजित पवारांचा ‘बुखारीया’ वरून राणेंना टोला
- नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याबाबत पालिकेत सुरक्षा व्यवस्था वाढवली; आयुक्तांनी दिले आदेश
- अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा राडा; विधानभवनाच्या पायऱ्यावरच जोरदार घोषणाबाजी
- नवाब मलिक यांचे दाऊद कनेक्शन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चहापानावर बहिष्कार?
- गेल्या ३० वर्षांमध्ये आम्ही सापाला दूध पाजलं, आता तेच आमच्यावर फुत्कारतय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे