राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्यावरून एकीकडे काँग्रेस सत्ताधारी भाजपवर टीका करत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी या सोहळ्याला समर्थन केले आहे. या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.
भगवान श्रीरामाचे चरित्र हे भारतीय भूमीला मानवतेशी जोडणारे असल्याचे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे. तर या पत्रकाची अखेर प्रियंका गांधींनी ‘जय सियाराम’ अशी घोषणा देऊन केली आहे.
या पत्रकात प्रियंका गांधी म्हणतात की, अनेक युगांपासून भगवान श्रीरामाचे चरित्र भारतीय भूमीमध्ये मानवतेला जोडण्याचे काम करत आले आहे. भगवान राम आश्रय आहे आणि त्यागही. राम शबरीचाही आहे आणि सुग्रीवाचाही. राम वाल्मिकींचे आहेत आणि भासांचेसुद्धा आहेत. राम कबिरांचे आहेत आणि तुलसीदासांचेसुद्धा आहेत.
सरलता, साहस, संयम, त्याग, वचनवद्धता, दीनबंधु राम नाम का सार है। राम सबमें हैं, राम सबके साथ हैं।
भगवान राम और माता सीता के संदेश और उनकी कृपा के साथ रामलला के मंदिर के भूमिपूजन का कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुत्व और सांस्कृतिक समागम का अवसर बने।
मेरा वक्तव्य pic.twitter.com/ZDT1U6gBnb
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) August 4, 2020