नवी दिल्ली : कृषि विधेयकावरून राज्यसभेत मोठा गदारोळ पाहण्यास मिळाला. विरोधकांनी कागदपत्रे फाडली, माइक तोडला. मात्र या गोंधळातच आवाजी मतदानाद्वारे विधेयकं मंजूर झाली. दोन कृषि विधेयकांना राज्यसभेत मंजूरी देण्यात आली. आता यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
जो किसान धरती से सोना उगाता है,
मोदी सरकार का घमंड उसे ख़ून के आँसू रुलाता है।राज्यसभा में आज जिस तरह कृषि विधेयक के रूप में सरकार ने किसानों के ख़िलाफ़ मौत का फ़रमान निकाला, उससे लोकतंत्र शर्मिंदा है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 20, 2020
सरकारचा अहंकार शेतकऱ्यांच्या डोळ्यात रक्ताचे अश्रू आणत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधींनी ट्विट केले की, जो शेतकरी जमिनीतून सोने उगवतो, त्याच्या डोळ्यांत मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणत आहे. कृषी विधेयकाच्या रूपाने सरकारने शेतकऱ्यांविरोधात मृत्यूचे फर्मान काढत लोकशाहीला लाज आणली आहे.
दरम्यान, शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभीकरण) विधेयक, 2020 आणि शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) करार किंमत आश्वासन आणि कृषीसेवा विधेयक, 2020 या दोन कृषी विधेयकांना राज्यसभेत मंजूरी मिळाली आहे.