नवी दिल्ली : मोदी सरकारने लागू केलेल्या कृषी विधयेकाला काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
सरकारने ज्याप्रमाणे नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय घेवून लहान दुकानदार आणि मध्यम उद्योजकांना संपवले त्याचप्रमाणे आता हे तीन कृषी कायदे आणून शेतकऱ्यांच्या आणि कामगागांच्या गळ्याचा घोट घेतला जाईल, असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधींनी अन्न वितरण आणि रेशनिंग व्यवस्थेच्या विकासाची गरज असल्याचे अधोरेखित केले आणि या व्यवस्थेत उणिवा असल्याचे अधोरेखित केले.
या व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे आणि अजून मोठ्या संख्येने मंडींची निर्मीती करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांना हमीभाव आणि पायाभूत व्यवस्थेची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
अमरिंदर सिंह म्हणाले, ” मोदींनी रेशनिंग व्यवस्था सुधारली आणि शेतकऱ्यांना योग्य हमीभाव दिला तर अंबानी आणि अदानी पैसा कमवू शकणार नाहीत, असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांनी या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात राज्यभर ट्रॅक्टरच्या रॅलीमध्ये खेती बचावो यात्रा काढुन केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी सभेला संबोधित करताना केंद्र सरकारवर टीका केली.
Read Also :
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून LGBT सेलची स्थापना https://t.co/ujGa1fH4Pk #ncp @NCPspeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 5, 2020