मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या तासाचू कल आला तेव्हा कॉंग्रेसने चारही राज्यांमध्ये मुसंडी मारली होती. मात्र मतमोजणी जशी जशी पुढे सरकत गेली तसा तेलंगणा वगळता तिन्हीही राज्यात कॉंग्रेस पिछाडीवर गेली. यातच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये भाजपने बहुमताचा जादुई आकडा गाठला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम राहिली आहे.
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीचा कल हाती येत आहे. आतापर्यंतच्या कलानुसार मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये भाजप आणि तेलंगणा, छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसची सत्ता येण्याची चिन्हे आहेत. हा कल हाती येताच राजधानी दिल्लीत मोठ्या हालचालीना सुरवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ६ वाजता दिल्ली मधील भाजप कार्यालयात जाणार आहेत. तर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडीया आघाडीच्या बैठकीसाठी नेत्यांना निमंत्रित केलं आहे. ६ डिसेंबरला इंडीया आघाडीची दिल्लीत बैठक होणार आहे.
दरम्यान, राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या १९९ जागापैंकी १६३ जागांमधून भाजप ११६ तर काँग्रेस ६७ जागांवर आघाडी घेतली आहे. छत्तीसगड मध्ये ९० जागांपैकी भाजप ४७ तर काँग्रेस ४२ जागांवर आघाडी घेतली आहे.
तेलंगणा राज्यात ११९ जागांमधून बीआर एस ला ४५ तर तर काँग्रेसला ६६ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपच्या वाट्याला ०३ जागावर आघाडी घेतली आहे. दुसरीकडे मध्यप्रदेशात २३० जागांपैकी काँग्रेस ७१ तर भाजप १५६ जागांवर आघाडी घेतली आहे.