जालना: कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली होती. अनलॉकच्या प्रक्रियेंतर्गत धार्मिक स्थळे काही राज्यांनी खुली केली. परंतू महाराष्ट्रात अद्याप मंदिरे बंदच आहेत. मंदिरे उघडावीत यासाठी भाजपकडून राज्यभरात ‘उद्धवा उघड दार’ असे घंटानाद आंदोलन करण्यात आले. आता यामुद्यावरून कोणीही राजकारण करू नये, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. मंदिर खुली केली जातील पण योग्य वेळेस त्याबाबत निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजेश टोपे म्हणाले की, मंदिरात जाऊन देवदर्शन घेणं, हा प्रत्येकाच्या श्रध्देचा भाग आहे (Rajesh Tope Criticize BJP). मात्र, यात कोणी राजकारण करु नये. देवेंद्र फडणवीस बारामतीमध्ये फिरत आहेत. त्यांनी राजकारण न करता, जरा नागपूरकडेही लक्ष घालावे, अशी टीका त्यांनी केली.
राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे अचानक मोठ्या प्रमाणात खुली केली व कोरोना बाधित रुग्णांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढून बेडस् उपलब्ध झाले नाहीत तर मग आपण रुग्णांना ठेवायचे कुठे?, असेही ते म्हणाले.