माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. तसंच येत्या 5 नोव्हेंबरला देशात किमान 2 तास रस्ता रोको करणार, अशी घोषणा शेट्टी यांनी केली आहे.
स तोडणी कामगारांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर काही नेत्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांचा प्रश्न सोडविला. मग शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून का कोणी पुढाकार घेत नाही ? असा सवाल करत राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
‘मुख्यमंत्री नसताना जी मागणी केली ती मुख्यमंत्री असताना पूर्ण केली असती तर शेतकरी समाधानी झाला असता,’ असा टोला राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसंच संपूर्ण महाराष्ट्रातील एकही प्रदेश अतिवृष्टीतून सुटला नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे…याला शेतकरी जबाबदार आहे का?