कोल्हापूर: मागील लोकसभा निवडणुकीत हातकणंगले क्षेत्रातून नवख्या असणाऱ्या धैर्यशील माने यांनी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटेनचे संस्थापक अध्यक्ष यांचा तब्ब्ल ६४ हजार मतांनी पराभव केला. राजकारणात मुरलेले आणि शेतकरी प्रश्नी अत्यंत आक्रमि होणाऱ्या शेट्टींचा झालेला पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. तरीही त्यांनी महाविकास आघाडीसोबत राहणे पसंद केले. भारतीय जनता पक्ष जाती जातींमध्ये तेढ निर्माण करून सामाजिक एकात्मतेला तडा देऊ पाहत आहे म्हणूनच पुरोगामी लोकांच्या सल्ल्यावरून महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय शेट्टींनी घेतला होता.
हे पण वाचा, राजू शेट्टी हे ‘पिंजरा चित्रपटातील मास्तर’ सदाभाऊ खोत यांची बोचरी टीका
मात्र सगळ्याच राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे आणि एकमेकांची कपडे उतरवण्याची भाषा सध्या त्यांच्याकडून सुरु आहे. यामुळं मी मंथन करून चळवळीचे नुकसान होऊ देणार नाही असा निर्णय घेतला आहे. आगामी २०२४च्या लोकसभा निवडणुकीत मी पुन्हा निवडून येणार हे नक्की आहे असा आत्मविश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. एका विशेष मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितले आहे. ते म्हणाले की सामाजिक एकात्मतेच्या रक्षणासाठी सर्व घटकांनी मिळून एकत्रित येऊन फळी उभारणं गरजेचं आहे. काहींनी शेतकऱ्यांना जाणून बुजून त्रास दिलेला आहे. मला वाटलं महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल मात्र सगळ्याच राजकीय पक्षांनी माती केली आहे.
हे पण वाचा, मोदी पंतप्रधान आहेत का दलाल? कांदा आयातीवरुन राजू शेट्टी आक्रमक
कुणाला चांगलं म्हणू आणि कुणाला वाईट हे मला आता कळत नाहीये. विरोधी पक्षात आले की सगळेच पक्ष शेतकऱ्यांना न्याय देण्याची भाषा करतात आणि सत्ता आल्यानंतर सगळंच विसरून जातात. सध्या तर एकमेकांची जिरवाजिरवी चालू आहे. जणू राज्यात राजकीय टोळीयुध्द चालू आहे. एकमेकांची कपडे उतरविण्याची भाषा चालू आहे.
हे पण वाचा, “राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक, त्यांची लढाई सरकार वाचवण्यासाठी”
हमाम मे सब नंगे है, ह्यांच्यामुळे जनतेची करमणूक होतेय. कोण काय लायकीचे आहे ते जनतेला समजायला लागले आहे. किरीट सोमय्यासारखे लोक ठराविक लोकांनाच लक्ष्य करतात. ते जी तक्रार करत आहेत, ती मी सहा वर्षांपूर्वीच केली होती. मुख्य फरक म्हणजे ते निवडक सहा कारखान्यांची तक्रार करत आहेत. मी सगळ्या ४३ कारखान्यांची करत होतो. ठराविकांना भिती घालून आपल्या पक्षात ओढणे, हे काही चांगलं लक्षण नाही. ज्या किमतीला साखर कारखाने विकले गेले, त्यामध्ये अधिकची भर टाकून सभासद परत घ्यायला तयार आहेत. त्यासाठी केंद्र सरकार तयार असेल तरच आमचा पाठिंबा असेल, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
हे पण वाचा,
शेतकऱ्यांच्या हिताच्या आड जो येईल त्याला तुडवणार; राजू शेट्टींचा इशारा