पुणे : काही साखर कारखान्यांची ऊसाची नोंदीची अट असते. ती म्हणजे टप्प्याटप्प्याने एफआरपी देण्यात येईल. ऊस पुरवठ्याचा करार वेगळा आणि ऊसाच्या नोंदीचा करार वेगळा आहे. मात्र शेतकऱ्यांकडूनच लिहून घेतलं जातं. साखर आयुक्तांनी एकरकमी एफआरपी देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी राजू शेट्टींनी केली. शेतकऱ्यांच्या आडवा जो येईल त्याला तुडवणार आहे. ज्याला आमदारकी हवी असते तो सरकारविरोधात बोलत नाही. आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत की नाही याचा पुर्नविचार केला जाईल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारीणी याचा निर्णय घेईल, असंही राजू शेट्टी म्हणाले.
100 कोटी लसीकरणाचा टप्पा हा ऐतिहासिक; देवेंद्र फडणवीसांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतूक
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेतील ठरावांचं पत्र साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना आज त्यांच्या कार्यालयात भेट घेत दिलं. ऊस परिषदेतील या मागण्यांकडे ना सरकार दुर्लक्ष करू शकतं, ना साखर कारखानदार असं ते म्हणाले. राजू शेट्टी यांनी यावेळी एकरमी एफआरपी, गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ, साखर कारखान्यांवरील कारवाई, महापुराच्या काळातील नुकसानाची मदत यावर भाष्य केलं. केंद्र सरकारने साखरेचे भाव हे 3700 रुपये करावी, असंही शेट्टी म्हणाले.
संजय राऊतांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा उतरली नसेल; चित्रा वाघ भडकल्या
कारखाने तुकड्या तुकड्या दराने एफ आरपी देणार तर शेतकऱ्यांचे पैसे 32 महिने गुंतून राहणार आहेत. मग त्याच्या व्याजाचं काय ?, असा सवाल राजू शेट्टींनी केला. एफआरपी संदर्भातील ही जबाबदारी शरद पवारांची होती त्यांनी धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा होता.जसा नाबार्ड डेअरीला पतपुरवठा करतं तर साखरेच्या तोरण मालाचं काय, अशी विचारणा शेट्टी यांनी केली आहे. शेतकऱ्यांवर साखर कारखान्यांनी बोजा टाकू नये, अशी मागणी देखील त्यांनी केली. गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाला निधी देणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. राज्य सरकारने ही पैसे दिले पाहिजेत आणि साखर कारखान्यांनी दिले पाहिजे. ऊसतोड महामंडळाला वेळ पडली तर शेतकरी पैसे देतील मात्र त्याचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे. ऊसतोड मजूरांना पेन्शन मिळायला हवी, असंही ते म्हणाले.
Read Also :
- राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना धमकीचा फोन; जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ
- मुंबई पोलिसांनी २७ कोटींचे हेरॉईन पकडले, पण त्यात हेरॉईनच नव्हती म्हणून प्रसिद्धी मिळाली नाही
- मुंबईतील इमारतीच्या आगीत एकाचा मृत्यू; महापौर किशोरी पेंडणेकर म्हणतात, सिक्युरिटीवर कारवाई करू…
- माजी आमदार विलास लांडेंचा समंजसपणा; आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित गव्हाणेंचे गुडघ्याला बाशिंग
- कोरोना लसीचे १०० कोटी डोस खरोखरच दिले गेलेत का? संजय राऊतांचा सवाल