मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये महिलांवर होणाऱ्या शाररिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. विरोधी पक्षातील भाजपने या मुद्द्यावरुन सरकारला घेरलेलं असतानाच औरंगाबादमध्ये दरोडेखोरांनी गावातील दोन महिलांवर सामुहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. औरंगाबादच्या घटनेवरुन भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सरकारवर टीका करताना शिवसेना खासदार संजय राऊतांवरही टीकेचे आसडू ओढले आहेत.
बड्या बड्या बाता आणि ‘धोरण’ खातंय लाथा, अशी विजय वडेट्टीवरांची गत झाली – गोपीचंद पडळकर
संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांच्या रक्षणासाठी परजतेय. कदाचीत उच्च प्रतीच्या गांजाची नशा उतरली नसल्यामुळे संजय राऊतांपर्यंत औरंगाबाद महिला अत्याचाराची घटना पोहचली नसेल असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी केला आहे. याचसोबत औरंगाबादच्या घटनेवरुन आपण निजामाच्या राजवटीत राहतोय की काय असा प्रश्न पडल्याचं म्हणत चित्रा वाघ यांनी राज्य सरकार आणि गृह मंत्रालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
१५ दिवसाची बाळांतीण आणि ८ महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार झालाय..
अन् संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचा-यांच्या रक्षणासाठी परजतेय…
कदाचित..उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नसल्यानं संजय राऊत यांच्या पर्यंत औरंगाबाद महिला अत्याचाराची घटना पोहोचली नसेल..— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 21, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील तोंडोळी गावात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास 7-8 दरोडेखोरांनी शेत वस्तीवर हल्ला चढवला. सुरवातीला वस्तीवर असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवण्यात आला. त्यांनतर त्यांना बांधून ठेवले. त्यानंतर घरातील एका 23 वर्षीय आणि दुसऱ्या 30 वर्षीय महिलेवर चार दरोडाखोरांनी सामूहिक बलात्कार केला. यावेळी घरातील वस्तू आणि पैसेही या दरोडेखोरांनी चोरले आहेत.
औरंगाबाद पैठणतालुका तोंडोळी गावच्या घटनेवरून आपण निजामाच्या राजवटीत राहतोय का हा प्रश्न पडलाय
ओल्या बाळंतीणवर बलात्कार..
गर्भवतीवर अत्याचार..
दरोडेखोर मोकाट..
उरला नाही कायद्याचा धाक..‘शिवशाही’चं वचन देणा-यांनी ‘निजामशाही’ आणलीय @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/L0v1uJdJun
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 21, 2021
यावेळी दरोडेखोरांनी घरातील पुरुषांना उलट्या कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून आधी त्यांना घराबाहेर काढले. त्यातील एकाला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर घरातील महिलांवर चौघांनी अत्याचार केले. ज्या दोन महिलांवर सामूहिक बलात्कार झाला त्यातल्या एका महिलेला आठ महिन्यांचं बाळ आहे. ही बाब लक्षात आली असूनही दरोडेखोरांनी हे अमानुष कृत्य केलं.
Read Also :
- आम्हाला देवळाची घंटा वाजविण्याची सवय, आज नाट्यगृहातील घंटा पहिल्यांदा वाजवली – अजित पवार
- बालेवाडीत आयएएस योगेश पाटीलांचे एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर; लहु बालवडकर सोशल वेलफेअरचा स्त्युत्य उपक्रम
- महाराष्ट्र सरकार समीर वानखेडेंची चौकशी करणार का? गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचे मोठे विधान, म्हणाले…
- 100 कोटी लसीकरणाचा टप्पा हा ऐतिहासिक; देवेंद्र फडणवीसांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतूक
- मंत्रालय बंद असतानाही हसन मुश्रीफांनी जनतेचे १५ हजार कोटी लुटले; किरीट सोमय्यांचा आरोप