पुणे : बॉलिवूड बाहेरच्या राज्यात घेऊन जायचं असा काही लोकांचा प्रयत्न चालला आहे. त्यासाठी काही मुख्यमंत्री राज्यात आले होते. तो त्यांचा अधिकार आहे त्याबाबत मला काही म्हणायचं नाही. पण ज्यावेळेस चित्रपटसृष्टी सुरू झाली तेव्हा पासून संपूर्ण देशाचे केंद्र हे मुंबई व महाराष्ट्र राहिलं आहे आणि ते महाराष्ट्रच राहावं ही सर्वांची अपेक्षा आहे. त्याकरिता महाविकास आघाडीचे सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल,’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.
माजी गृहमंत्री व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांचे हनीमून कुठे सुरू आहे, ते शोधा – अमृता फडणवीस
राज्यातील चित्रपटगृहे व नाट्यगृहे आज शुक्रवारपासून सुरू होत आहेत. करोनामुळं बंद असलेल्या नाटकाची घंटा आता वाजणार आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरुपात तिसरी घंटा वाजवून नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी बालगंधर्व रंगमंदिरात अजित पवारांच्या हस्ते रंगमंच पूजन करण्यात आलं. अजित पवार यांनी चित्रपटसृष्टी व नाट्यसृष्टीबाबत भाष्य केलं आहे. तसंच, दिवाळीनंतर १०० टक्के क्षमतेनं नाट्यगृह सुरू करण्याचा विचार करू, असं संकेतही अजित पवारांनी दिले आहेत.
भाजप आमदाराच्या मॉलमध्ये राष्ट्रवादीची दुकाने; खासदार अमोल कोल्हे यांच्या समोरच पक्षाचा भांडाफोड
आम्हाला देवळातील घंटा वाजविण्याची सवय आहे. पण आज नाट्यगृहातील घंटा पहिल्यांदा वाजवली. आज बऱ्याच महिन्यानंतर नाट्यगृह सुरु झाले आहेत. सरकार चालवत असताना हे बंद करा, ते बंद करा, म्हणायला आम्हालाही आवडत नाही. मात्र, नाईलाज असतो. खरंतर असा प्रसंग आपल्यावर यायला नको होता. पण निसर्गाच्या पुढे काहीही नाही. १९ महिने सातत्याने सर्व बंद होतं. कधी सुरु करणार असा प्रश्न सातत्याने विचारण्यात यायचा. मात्र, आपल्याकडून चुका होऊ नये आणि तिसरी लाट येऊ नये यासाठी सरकार म्हणून खबरदारी घ्यावी लागली,’ असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
माजी गृहमंत्री व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांचे हनीमून कुठे सुरू आहे, ते शोधा – अमृता फडणवीस
‘बालगंधर्वच्या नुतनीकरणाबाबतही अजित पवारांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. तसंच, सध्या आमच्याकडे ५६ हजार कलाकारांची यादी आहे. त्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून ५ हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला. इथून पुढे कलावंतांना त्रास होणार नाही याची काळजी घेणार आहे,’ असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Read Also :
- बालेवाडीत आयएएस योगेश पाटीलांचे एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर; लहु बालवडकर सोशल वेलफेअरचा स्त्युत्य उपक्रम
- महाराष्ट्र सरकार समीर वानखेडेंची चौकशी करणार का? गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचे मोठे विधान, म्हणाले…
- 100 कोटी लसीकरणाचा टप्पा हा ऐतिहासिक; देवेंद्र फडणवीसांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतूक
- मंत्रालय बंद असतानाही हसन मुश्रीफांनी जनतेचे १५ हजार कोटी लुटले; किरीट सोमय्यांचा आरोप
- रुपाली चाकणकरांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड; चित्रा वाघ यांचा पहिल्यांदा विरोध आता शुभेच्छा