मुंबई : कारखानदार भामटे, चोर आहेत. हे शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर देणार नाहीत. म्हणुन स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिल्यापासुन शेतकऱ्यांचा जो अधिकार आहे. एक रकमी एफआरपीचा तो अधिकार अबाधित राहिला पाहिजे. तसच या वर्षी गळीप हंगाम सुरू होत असताना एक रकमी एफआरपी झाल्याशिवाय महाराष्ट्रातील एकही कराखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्विभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांनी दिला आहे.
“कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ‘ईडी सरकार’ लवकरच ‘रनआऊट’ होईल”
महाविकास आघाडीने घातलेला नर्णय बेकायदेशीर आहे. महाविकास आघाडीने एफआरपीचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला. कारखाने बंद होऊन देखील शेतकऱ्यांना एफआरपी नाही, अशी टीका देखील स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावर केली आहे.
भाजपचं लक्ष्य आता बारामती, भाजप प्रदेशाध्यक्ष 5 सप्टेंबर रोजी दौऱ्यावर येणार
सोबतच, महाविकास आघाडी सरकारने महसुल विभागनिहाय अंदाचे साखर उतारा निश्चित करून त्यानुसार एफआरपी निश्चित करणयाचा निर्णय घेतला होता. 2021-22 व त्यापुढील हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत हंगाम सुरू झाल्यानंतर सुरूवातीचा किमान एफआरपी देण्यासाठी पुणे आणि नाशिक विभागासाठी 10 टक्के तर औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर विभागासाठी 9.50 टक्के उतारा निश्चित केला आहे. अंतिम उतारा निश्चित करून उर्वरित एफआरपी देण्याचे सरकारचे धोरण असल्याने एफआरपीटे दोन तुकडे पाडले जाणार आहेत.
“टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांचीही चौकशी व्हावी”; शिवसेनेची मागणी
एकरकमी एफआरपी मिळावी या मागणीसाठी शेतकरी संघटना आधीपासुनच आग्रही आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारने आपल्या अधिकारांचा वापर करत दोन टप्प्यात एफआरपी देण्याचा घाट घातला आहे. या निर्णयाला शेतकरी संघटनांनी कडाडून विरोध केला असून सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार या असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यापुर्वी म्हणाले होते.
Read also
- “आमच्याकडे फक्त अडीच वर्ष शिल्लक आहेत, त्यामुळे…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- “दसरा मेळावा शिंदे गट घेऊ शकतो, मात्र शिवतीर्थावर शिवसेनेचाच मेळावा होणार”
- सुरत, गुवाहाटी आणि गोवा फिरून आल्यानंतरही…; राष्ट्रवादीने बच्चू कडूंना पुन्हा डिवचलं
- “भविष्यात रूपाली ताई तुमचं सुद्धा चांगलं होऊ द्या ओक्के”; शहाजी बापू पाटलांचा टोला
- “शिवसेनेशी गद्दारी एकनाथ शिंदेंनी नाही तर उद्धव ठाकरेंनी केली”; नारायण राणेंची ठाकरेंवर घणाघाती टीका