मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबई मेट्रो 3 ची चाचणी पार पडली. सारीपुतनगर ते मरोळ नाका येथील ट्रॅकवर ट्रायल रन घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या संचालीका अश्विनी भिडे यांचं कौतुक केलं. तर ठाकरे सरकारवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.
भाजपचं लक्ष्य आता बारामती, भाजप प्रदेशाध्यक्ष 5 सप्टेंबर रोजी दौऱ्यावर येणार
उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात आरे कारशेड मेट्रो प्रकल्पाला विरोध होता. यावेळी अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून उचलबांगडी झाली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्या पुन्हा आल्या. त्याचाच धागा पकडत शिंदे म्हणाले की, आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पहिली ऑर्डर अश्विनी भिडे यांच्यासाठी काढली. शेवटी झोकून देऊन काम करणारा अधिकारीच सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवत असतो.
“टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांचीही चौकशी व्हावी”; शिवसेनेची मागणी
आमच्याकडे फक्त अडीच वर्षच आहेत. त्यामुळे आम्हाला कमी वेळेत जास्त काम करायचं आहे. अनेक आव्हानांना तोंड देत हा प्रकल्प इथपर्यंत आला असं अश्विनी भिडे असं म्हणाल्याचं शिंदे यांनी सांगितलं. मात्र आता काळजी करू नका, इथूून पुढे तुम्हाला कोणत्याही आव्हानांचा सामना करावा लागणार नाही. आपल्याला फक्त काम करायचे आहे. असंही एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं.
“शिवतीर्थवर होणारा ‘दसरा मेळावा’ म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे”
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने मुंबई हायकोर्टाला सांगितले की, मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मेट्रोकारशेडसाठी MMRDA ला कांजूरमार्ग येथील जमिनीचा काही भाग सोपवण्याचा ऑक्टोबर 2020 ला दिलेला आदेश मागे घेतला आहे.
Read also
- “दसरा मेळावा शिंदे गट घेऊ शकतो, मात्र शिवतीर्थावर शिवसेनेचाच मेळावा होणार”
- सुरत, गुवाहाटी आणि गोवा फिरून आल्यानंतरही…; राष्ट्रवादीने बच्चू कडूंना पुन्हा डिवचलं
- “भविष्यात रूपाली ताई तुमचं सुद्धा चांगलं होऊ द्या ओक्के”; शहाजी बापू पाटलांचा टोला
- “शिवसेनेशी गद्दारी एकनाथ शिंदेंनी नाही तर उद्धव ठाकरेंनी केली”; नारायण राणेंची ठाकरेंवर घणाघाती टीका
- “कमी बॉल्सवर जास्त रन काढण्याच्या नादात ‘ईडी सरकार’ लवकरच ‘रनआऊट’ होईल”