“अभिनेत्री कंगना राणावत ड्रग्जशी संबंधित माफिया नेते-अभिनेत्यांची नावे सांगण्यास तयार असल्याचे स्वतः सांगत आहे. याचे स्वागत करत महाराष्ट्र सरकारने चार दिवसानंतरही कंगनाला सुरक्षा का दिली नाही?, असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.
राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. “अभिनेत्री कंगना राणावत ड्रग्जशी संबंधित माफिया नेते-अभिनेत्यांची नावे सांगण्यास तयार असल्याचे स्वतः सांगत आहे. याचे स्वागत करत महाराष्ट्र सरकारने चार दिवसानंतरही कंगनाला सुरक्षा का दिली नाही? रियाचे वकील किंवा दलाल असल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार कुणाला लपवण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न करत आहे?” असा सवाल राम कदम यांनी विचारला.
महाराष्ट्रसरकार ला कोणाल वाचवायचे आहें ? @KanganaTeam ला सुरक्षा का दिली नाही ? @AnilDeshmukhNCP @OfficeofUT @CPMumbaiPolice #SushantTruthNow #SushantSinghRajputCase pic.twitter.com/jKNNun9ZyV
— Ram Kadam (@ramkadam) August 30, 2020
“सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्तीला एका फोन कॉलवर मुंबई पोलिसांकडून सुरक्षा उपलब्ध झाली. दुसरीकडे कंगनाने सुरक्षा पुरवल्यास बॉलिवूड आणि मुंबईतील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्याची तयारी दाखवली आहे. मात्र तिला साधे उत्तरही न दिल्याने दुहेरी मापदंडामुळे संशय उत्पन्न होत आहे” असा घणाघात राम कदमांनी केला