मुंबई: भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. एका छोटेखानी कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राणे यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातील एकूण चार नेत्यांना स्थान मिळाले असले तरी राणेंना मिळालेल्या मंत्रिपदाविषयी मोठी राजकीय चर्चा रंगली आहे. त्यांना देण्यात आलेली संधी ही उद्धव ठाकरे पर्यायाने शिवसेनेला शह देण्यासाठी आली अशी चर्चा सध्या रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. नारायण राणे यांना ठऱवून मंत्रिपद दिले, असे काहीही नाही. येत्या काळात कटुता कशी कमी होईल यावर केंद्र सरकार काम करत आहे, असे माझे मत आहे. ते मुंबईत माध्यामाशी बोलत होते.
हे पण वाचा: मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागलेल्या नारायण राणेंकडे कोणतं खातं?
हे पण वाचा: नारायण राणेंना केंद्रात मंत्रीपद देऊन, भाजपने खेळली मोठी राजकीय खेळी; नेमकं गणित काय? वाचा सविस्तर
यावेळी बोलताना पाटील यांनी राणे यांच्या शिवसेनेत असलेल्या कार्यकाळावर भाष्य केलं. नारायण राणे यांनी शिवसेना सोडून १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. कोणाला ठरवून मंत्रिपद देण्यात आलेले नाही. दोन्ही घराण्यांमध्ये आता हळूहळू सगळ काही सुरळीत होण्यासाठी आगामी काळात कटुता कशी कमी होईल यावर केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहे अस वाटत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
हे पण वाचा: जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंनाही अटक होणार?
हे पण वाचा: भोसरी जमीन आर्थिक घोटाळा : एकनाथ खडसेंच्या जावयाला ईडीकडून अटक
तसेच पुढे बोलताना नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला काय फायदा होईल यावरही पाटील यांनी भाष्य केले. राणेंच्या मंत्रिपदामुळे महापालिकेच्या निवडणुकीत फायदा होईलच. पण शिवसेनेला शह देण्यासाठी हा सगळा प्रपंच आहे असे नाही. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला आणि समाजाला प्रतिनिधीत्व देता येईल यासाठी प्रयत्न केला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टींचा राजकीय अर्थ काढण्यात नाही.जसजसा माणूस वाढत जातो;तसतशा इतर सगळ्या गोष्टी कमी होत जातात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले