मुंबई : आतापर्यंत 5 वेळा आमदारकी तर 2 वेळा खासदार, परिवहन मंत्री, गृहराज्यमंत्री, पर्यटनमंत्री पद भुषिवलेले गजानन किर्तीकर यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. काल त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून पक्षाविरोधी कारवाया केल्याप्रकरणी हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर लगेचच रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावर आता खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“आव्हाड साहेबांची कोणतीही चुक नाही, त्यांनीच मला बाहेर काढलं”; मारहाण केलेल्या तरूणाचं स्पष्टीकरण
किर्तीकर आमचे ज्येष्ठ सहकारी होते. या वयात पक्षानं त्यांना काय दिलं नाही? पाच वेळा आमदार होते, दोन्ही मंत्रीमंडळात ते मंत्री राहिले. पक्षाकडून दोनदा त्यांना खासदारकी मिळाली, त्यांचे चिरंजीव अमोल किर्तीकर हे कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्षासोबत आहेत. पण सर्व काही भोगलेले किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात, तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी एक वेगळी भावना निर्माण होते. यामुळे फार काही सळसळ झाली नाही. ठिक आहे गेले. उद्यापासून लोक त्यांना विसरून जातील अशी खोचक टिका त्यांनी केली आहे.
“आम्हा सर्वांना जेलमध्ये जावे लागले तरी चालेल पण..;”सुप्रिया सुळेंचा सरकारला इशारा
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत बंड केला. त्यानंतर शिवसेनेचे 12 खासदारांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. त्यातच आता खासदार गजानन किर्तीकर यांनी देखील उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. शिवसेनेतील अनेक नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडत असताना अनेक राजकीय संघटना ठाकरेंच्या पाठीशी उभ्या राहिल्या आहेत.
पंजाला मशालीची साथ..! राहुल गांधीच्या यात्रेत आदित्य ठाकरेंची एंन्ट्री
दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये राज्यातील राजकीय समीकरणं बदलताना दिसणार आहेत. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची युती होण्याची शक्यता आहे. त्याला मनसेची देखील साथ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुका लढतील, असं संकेत सध्या मिळत आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये बंडखोर आमदारांचा चांगलाचं कस लागणार आहे.
Read also
- “आमच्या पोरांना लग्नाआधी पोरं होतात”; राष्ट्रवादीच्या माजी आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य
- मग आता प्रश्न विचारल्यावर मिरच्या का झोंबतायत ? काॅंग्रेसचा तिखट सवाल
- “राष्ट्रवादीची साथ सोडा सांगून कंटाळलो, अन् निर्णय घेतला”; किर्तीकरांचा शिंदे गटात प्रवेश
- “फडणवीस काल म्हणाले की, द्वेषाचं राजकारण थांबलं पाहिजे, अन् आज आव्हाडांना अटक”
- “आव्हाडांना अटक करून मोगली सरकारने निर्लज्जपणाचा कळस गाठला”