अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत राज्य सरकारची भूमिका कायम आहे. महाराष्ट्रात परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळे केंद्रानेही या भूमिकेला समर्थन द्यावे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली होती तसेच राज्यातील सर्व विद्यापीठातील कुलगुरूंनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही असे निवदेन पाठवल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र नागपूर, अमरावती गोंडवाना या विद्यापीठात असे कोणतेही निवदेन आलेले आंही असे तेथील कुलगुरूंच्या म्हणणे आहे त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत बोगस दावे करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्यपालांना पत्राद्वारे केली आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याबाबत पहिल्या दिवसापासून दुरदैवाने राजकारण करत आहेत. ते शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार न करता राजकीय व पक्षीय दृष्टिकोनातून या विषयावर निर्णय घेत आहेत. त्यामुळे शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये राजकारण करण्याचे घृणास्पद कृतयु ते करत आहेत. त्यामुळे राज्यपालांनी उदय सामंत यांची पदावरून हाकाळपट्टीकरवी अशी मागणी अतुल भातखळकर यांनी केली आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत बोगस दावे करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा…@OfficeofUT pic.twitter.com/f3dBRd4tUW
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 15, 2020