मुंबई : मराठा आरक्षणावरून भाजप समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, भाजपने आग लावण्याची कामे करू नये, असं म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. मागील सरकारने मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विरोधकांना कधीच विश्वासात घेतले नाही. पण महा विकास आघाडी सरकारने सर्वांना सोबत घेऊन, आरक्षणाच्या मुद्यावर काम केले आहे. हे पाहून भाजपच्या नेत्यांमध्ये पोटदुखी दिसून येत आहे. यातूनच भाजपचे नेते समाजात अपप्रचार करण्याचं काम करीत आहे, हे त्यांनी लवकर थांबवावं, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.
दरम्यान मराठा आरक्षणाला सर्वोचा सर्वोच्च न्यायलयाने स्थगिती दिल्यापासून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलेलं आहे. सत्तापक्ष आणि भाजप एकमेकांवर जोरदार आरोप करत राजकीय वातावरण तापवलेलं आहे, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळ बैठक घेऊन चर्चा केली आहे.
सारथीचं उपकेंद्र कोल्हापूरला झालं पाहिजे. आरक्षणाची चोरी होतेय हे उघड आहे. मात्र, राजकरणामुळे हे दाबलं जातं आहे. त्यामुळे मराठा समाज भरडला जातो आहे. सारथीमध्ये अजित पवार यांच्या कामाच्या स्पीडला तग धरणारी यंत्रणा त्याठिकाणी नाही असं वक्तव्य मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी केलं आहे. तसेच मराठा समाजाच्या सध्याच्या परिस्थितीबाबत यावेळी त्यांनी भाष्य केलं आहे.
सगळीच सत्व परीक्षा मराठा समाजाने द्यावी, अशी भूमिका काही विचारवंतांनी घेतली असून हे चुकीचं आहे, असं सांगतानाच प्रत्येकवेळी मराठा समाज समन्वयाची भूमिका घेणार नाही. आधीच मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असून विधवेसारखी झाली आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केली.
Read Also :
नागपूर मनपासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी,शिवसैनिकांची नवीन फळी मैदानातhttps://t.co/88CDu7fXKA#Shivsena #BJP #CMThackarey #Adityathackarey @ShivsenaComms @ShivSena @AUThackeray
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 29, 2020