मुंबई : भाजपने कुठलीही पालिका निवडणूक लढवली, तरी महाविकास आघाडी त्यांचा पराभव करेल, असा दावा काँग्रेस नेते सचिन सांवत यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिला.
महाविकास आघाडीला राज्यातील जनतेने स्विकारले आहे. मतदारांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवली आहे, असे म्हणत सांवत यांनी भाजपवर निशाणा साधला.
आमदार सरनाईक यांच्या ऑफिसवर ईडीने छापेमारी केली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना सांवत म्हणाले की, केंद्रीय संस्थांचा वापर करुन ऑपरेशन लोटस राबवण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी ईडी, सीबीआयचाही वापर केला जात आहे. पण आमच्या आमदारांवर याचा काहीही परिणाम होणार नाही.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला त्यांची जागा दाखवली आहे. भाजपने कोणतीही निवडणूक लढवली तरी त्यांचा पराभव निश्चित आहे, असा दावा त्यांनी केला.