मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात उलटसुलट विधाने करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे तोंड एव्हाना पूर्णपणे काळे झाले आहे. आता भाजपच्या ड्रग कनेक्शनची चौकशी एनसीबी केव्हा करणार, असा प्रश्न प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारला आहे.
सुशांत सिंह प्रकरणात भाजपाचे महाराष्ट्राच्या बदनामीचे कारस्थान उघड झाल्यानंतर एनसीबी बॉलिवूड ड्रग कनेक्शन ची चौकशी करते आहे तर मुंबई पोलीसांनी का केली नाही? असा प्रश्न भाजपाने @OfficeofUT व @AnilDeshmukhNCP यांना पत्र लिहून विचारला आहे. गिरे तो भी टांग उपर असा हा प्रकार आहे pic.twitter.com/L45btg9Er3
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 4, 2020
”बॉलीवूड व ड्रग कनेक्शनची चौकशी करावी, असेही भाजपचे म्हणणे आहे. मात्र गेले पाच वर्षे फडणवीस सरकार असताना एनसीबीचे कार्यालय आणि बॉलिवूड मुंबईतच होते. मग तेव्हा एवढी वर्षे त्यांची चौकशी का झाली नाही, बायोपिक पोस्टर प्रसिद्ध करताना हजर असलेल्या संदीपसिंह याचा संबंध काय होता, या बाबींची उत्तरे आता मिळाली पाहिजे,” असे सांगून सावंत पुढे म्हणाले की, सुशांतसिंह प्रकरणात भाजपचे तोंड काळे झाले आहे. त्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली असून जनता त्यांना कदापीही माफ करणार नाही. मुंबई पोलिसांची सुरक्षा घेऊन मुंबई पोलिसांनाच बदनाम करणाऱ्या या नेत्यांचे चेहरे बघून ठेवा. हा दुटप्पीपणा जनता कायम लक्षात ठेवेल हे नक्की.
सुशांत सिंह प्रकरणात भाजपाचे महाराष्ट्राच्या बदनामीचे कारस्थान उघड झाल्यानंतर एनसीबी बॉलिवूड ड्रग कनेक्शन ची चौकशी करते आहे तर मुंबई पोलीसांनी का केली नाही? असा प्रश्न भाजपाने @OfficeofUT व @AnilDeshmukhNCP यांना पत्र लिहून विचारला आहे. गिरे तो भी टांग उपर असा हा प्रकार आहे pic.twitter.com/L45btg9Er3
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 4, 2020
Read Also :
उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा ; हाथरस प्रकरणावरून शिवसेना आक्रमक https://t.co/m9rl1xFLQe #HathrasCase
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 4, 2020