मुंबई : सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकली तरी भाजपकडून लोकांना तुरुंगात डांबले जाते. आता तोच भाजप आम्हाला स्वातंत्र्याविषयी प्रवचन देत असल्याचा पलटवार काँग्रेसकडून करण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोमवारी महाराष्ट्रात स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचे वक्तव्य केले होते. या टीकेला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. भारतीय जनता पक्षाची जी लोक आहेत ती ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ अशा पद्धतीचा कारभार करत असल्याचे त्यांनी म्हटले.
काय म्हणाले होते जे.पी. नड्डा?
महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचे सरकार काम करण्यापलीकडे सर्वकाही करत आहे. राज्यातील लोकांच्या स्वातंत्र्यावर हल्ला केला जात आहे. ही काँग्रेसची ट्रेडमार्क स्टाईल असल्याची टीका जे.पी. नड्डा यांनी केली होती.
दरम्यान आज मोदींच्या नावावर ५६ आमदार निवडून आणले हिम्मत असेल तर स्वतः च्या नावावर निवडून दाखव, पुढच्या निवडणुकीत शिवसेनेचे फक्त १० ते १५ आमदार निवडून येतील असा हल्ला भाजप खासदार व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कलम ३७० बद्दल बोलतात पण त्यांना कायदा तरी कळतो का? मोदींच्या नाववर 56 आमदार निवडून आले. ते नसते तर 25 ही निवडून आले नसते. यांनी बेईमानी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. यांनी 56 आमदारांसाठी बेईमानी केली, अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे.
कालचा दसरा मेळावा म्हणजे 47 शिवसैनिकांमध्ये झालेली भव्य सभा होती, असा उपरोधिक टोला राणेंनी लगावला. आजवर महाराष्ट्रात जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या कार्याने आणि भाषणशैलीने देशात राज्याची प्रतिष्ठा वाढवली. याला सध्याचे मुख्यमंत्री अपवाद आहेत. तेच उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर टीका करतात. मोदींच्या धोरणावर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. त्यांनी महाराष्ट्राचा कारभार सांभाळावा, असे नारायण राणे यांनी सांगितले.
Read Also :
नारायण राणे यांनी निष्ठेच्या गप्पा माराव्या? हे दुर्दैवी : अर्जुन खोतकर https://t.co/zq4jjtU1EF @miarjunkhotkar @ShivSena @ShivSena
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 26, 2020