मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरणातील महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी होत आहे. ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याची मागणी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. या महिलेसोबत दुष्कर्म करण्यात आला होता. त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. पण आरोपीला अटक केल्यानंतर निश्चित रुपाने सरकार लवकरात लवकर चार्जशीट दाखल करेल. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवू, तसा आग्रह गृहमंत्र्यांना धरू. लवकरात लवकर कडक शिक्षा मिळाली पाहिजे. या शिक्षेने आरोपींच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे अशी शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं मलिक यांनी सांगितलं.
We will make sure that the charge-sheet is filed within a given frame of time & the case is fast-tracked to bring the accused to justice: Maharashtra Minister Nawab Malik on Mumbai rape case pic.twitter.com/nj9jD5AwcT
— ANI (@ANI) September 11, 2021
दरम्यान, पीडीत महिलेचा मृत्यू झाल्याचं कळताच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी राजावाडी रुग्णालय परिसरात येऊन जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. तसेच आरोपीला अटक करण्याची मागणी केली. राजावाडी रुग्णालय परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली असून तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
‘बाप्पाने राज्य सरकारला हीच बुद्धी द्यावी की…’, फडणवीसांचे गणरायाला साकडे
मोहन चौहान या नराधमाने महिलेवर बलात्कार झाला होता. बलात्कारानंतर प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस सुरू असलेली तिची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. महिलेचा मृत्यू झाल्यानंतर डीसीपी आणि एसपींनी तात्काळ राजावाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. राजावाडी पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Read Also :
- ‘महाराष्ट्रातल्या महिलांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका!’ चित्रा वाघ यांची संतप्त प्रतिक्रिया
- महाविकास आघाडी सरकार स्थिर की अस्थिर? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
- धनंजय मुंडे, करुणा शर्मांचे फोटो टाकून FB वर बदनामीकारक पोस्ट; फडणवीस, पवारांबद्दल अश्लिल ‘मजकूर’
- पन्नास वर्षे झाली, सत्ता शरद पवारांच्या घरात पाणी भरते; भाजप आमदाराची बोचरी टीका
- खासदार गिरीष बापटांचे वर्चस्व कमी करण्याचा घाट? भाजपचे नवीन शहर कार्यालय ‘राष्ट्रवादी’च्या शेजारीच