मुंबई : राज्यातील अनेक नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याआधीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नामांतराची घोषणा केली. त्याचबरोबर मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय देखील उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. मात्र एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नामांतराला स्थगिती दिली आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
गुलाल उधळण्यास विलंब होणार; स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना स्थगिती
शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं म्हणणाऱ्यांनी आता औरंगाबाचं संभाजीनगरचं नामांतर का थांबवलं? औरंगजेब हा सरकारचा नातेवाईक कधीपासून झाला? मुळात असा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्टोची टांगती तलवार सरकारवर आहे. त्यामुळे काही काम नसल्यामुळे हे सरकार निर्णयांना स्थगिती देत सुटले आहेत. अशी टिका संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर केली आहे.
दिपक केसरकर कोण? कुठे होते? किती वेळा पवार यांच्या गाडीमध्ये बसून फिरत होते?
महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या 5 निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. ठाकरे सरकारने औरंगाबाद, उस्मानाबाद, मुंबईतील आंतराराष्ट्रीय विमानतळाला दि.बा पाटील हे नाव दिलं. पण या सरकारने हे सर्व निर्णय फिरवले. तर हे सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही आहे. संभाजीनगर कधी करणार, हा प्रश्न भाजप अनेक वर्षापासून विचारत होते. दि. बा. पाटील यांच्या नावासाठी मोर्चे काढत होते. उद्धव ठाकरे यांनी कुणाचीही पर्वा न करता हे निर्णय घेतले. या निर्णयाला सरकारने स्थगिती दिली असेल तर असे ढोंगी इतर कुणी नाहीत. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
“आता जमिनीवर राहा, उगाच उडू नका, अन् लायकीत रहा”; निलेश राणेंचा केसरकरांना इशारा
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 29 जून रोजी मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ठाकरे सरकारच्या इतर निर्णयांप्रमाणं औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकार अल्पमतात असताना राज्यपालांनी बहुमत चाचणीचं पत्र दिल्यानंतर हे निर्णय घेतले आहेत. त्यावर शिंदे सरकारने आक्षेप घेतला आहे.
Read also
- उद्धव ठाकरेंचा ऑगस्टपासून महाराष्ट्रात झंझावत दौरा! बंडखोरांना जोरदार प्रत्युत्तर देणार
- उद्धव ठाकरेंना शिंदेंचा मोठा धक्का; औरंगाबादसह, उस्मानाबाद नामांतराला स्थगिती
- “ज्या आमदारांना एकनाथ शिंदेंचा फोन जाईल, तो मंत्री बनेल”; अब्दुल सत्तरांचं सुचक वक्तव्य
- “लबाड लांडगे ढोंग करतायत, दिलासा द्यायचं सोंग करतायत”
- शरद पवारसाहेबांनी देखील द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा; नवनीत राणांची मागणी