शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. वाय. बी. चव्हाण येथे संजय राऊत आणि शरद पवार यांची महत्वपूर्ण बैठक झाली असून यावेळी त्यांनी सुशांतसिंह प्रकरण तसेच विविध विषयांवर चर्चा केली असे संजय राऊत यांनी सांगितले तसेच यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका देखील केली.
संजय राऊत यांनी याबाबतची माहिती आपलय ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट आहे. “होय , मा.शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्रातील व देशातील घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. कुणालाही चिंतेचे अथवा पोटदुखीचे कारण नाही.” असे ट्विट करत संजय राऊत यांनी विरोधकांना देखील टोला लगावला. तसेच राजकारण हे चुकीच्या दिशेने चालू असून यात सरकारला मात्र काही धोका नसल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले.
होय ,
मा.शरद पवार यांना भेटलो.
महाराष्ट्रातील व देशातील घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. कुणालाही चिंतेचे अथवा पोटदुखीचे कारण नाही.— Sanjay Raut (@rautsanjay61) August 12, 2020
संजय राऊत म्हणाले, “राजस्थानचा संबंध महाराष्ट्राशी लावू नका. महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात पाऊस पडतोय त्यात सगळं हे वाहून गेलंय. विरोधकांचा आत्मानंद आहे. राज्यापुढे खूप प्रश्न आहेत. विरोधकांना हे सरकार पाडणं, अस्थिर करणं यात रस आहे. त्यांनी जनतेच्या दुःखावर पोळ्या भाजत राहावं. आम्हाला खूप कामं आहेत.”