मुंबई : गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी इडीच्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिलासाच नाही. न्यायालयाने पुन्हा एकदा संजय राऊत यांना झटका दिला आहे. त्यामुळे त्यांच्या कोठडीत आता 2 नोव्हेंबर पर्यंत वाढ करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दिवाळी सण हा देखील संजय राऊतांचा तुरूंगातच जाणार आहे.
“उद्धव ठाकरे राजकारणी झाले नसते तर ते वकिल किंवा डॉक्टर झाले असते”; आदित्य ठाकरे
गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी राऊतांना 31 जुलै रोजी इडीने अटक केली होती. त्यानंतर जवळपास दोन पेक्षा अधिक महिने संजय राऊत तुरंगातच आहेत. त्यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. मात्र प्रत्येकवेळी इडीने त्याला जोरदार विरोध करीत न्यायालयीन कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. त्यामुळे आता याप्रकरणी पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
“ठाकरेंना क्लीन बोल्ड करण्यासाठी शरद पवार अन् मोदी एकत्र येतील”; केंद्रीय मंत्र्याचं सुचक वक्तव्य
पत्राचाळीतील 1039 कोटी रूपयांच्या गैरव्यवहारात संजय राऊत यांचा सुरूवातीपासूनच सहभाग असल्याचा दावा इडीने केला आहे. याप्रकरणी इडीने नुकतेच जवळपास 7000 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केले होते. पत्राचाळ पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग असून, अगदी सुरूवातीपासून ते प्रत्येक गोष्ट कृतीत आणण्यात त्यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने आरोपपत्रात केला आहे.
Read also
- “साहेब चिंता करू नका, तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची राहील”
- “तर येणाऱ्या निवडणुकीत मंत्र्यांना मतांचा दुष्काळ दिसेल”; राष्ट्रवादीचा राज्य सरकारवर निशाणा
- “प्रत्येक जण गट स्थापन करतोय, माझा ही गट लवकरच दिसेल”; दिपाली सय्यद
- “राज ठाकरे, शिंदे अन् देवेंद्र फडणवीस एकत्र येणार”; तारिख अन् वेळ ही ठरली ?
- “राष्ट्रवादीविरोधात शिंदे-फडणवीसांची पुण्यात मोठी फिल्डिंग”; दोन्ही बांजूचे नेते एकवटले