मुंबई – मनी लॉन्डरिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यलयावर काल ईडीने छापेमारी केली. त्यांचे पुत्र विहंग यांना ताब्यात घेऊन त्यांची पाच तास चौकशी करण्यात आली. यावरून शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या सूडाचं राजकारण सुरू आहे. पण राज्यात त्यांची सत्ता नाही आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिला
आम्ही चौकशांना घाबरत नाही. चौकशांना आता तुम्ही घाबरायला हवं. कारण राज्यात तुमचं सरकार नाही आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. सध्या जुनी थडगी उकरण्याचं काम ईडीकडून सुरू आहे. सध्या ते उत्खनन करत आहेत. आता ईडीवाले खोदकाम करत मोहंजोदडो, हडप्पापर्यंत जातील, असा टोला राऊत यांनी लगावला.
सध्या सुरू असलेलं सुडाचं अन् बिनबुडाचं राजकारण संपू द्या. आज पत्ते तुम्ही पत्ते पिसताय, पण डाव आम्ही उलटवू, तसेच आर्थिक गैरव्यवहार केलेल्या १०० नेत्यांची यादी माझ्याकडे आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला. सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी संपू द्या. मग १२० प्रमुख नेत्यांची यादी मी ईडी आणि अर्थ मंत्रालयाला पाठवेन. त्यांच्यावर काय कारवाई होते बघू, असं राऊत यांनी सांगितलं.
Read Also –
जेव्हा सत्यजीत तांबेंसाठी अहमद पटेल थेट ठाकरेंना फोन करतात..!
‘सरकारमध्ये कामाची संधी मिळालेली नाही हे त्यांचं खरं दुखणं’ ; अजित पवारांचा भाजपवर निशाणा
‘चंद्रकांत पाटील सहा वर्षे आमदार-मंत्री असताना झोपले होते का?’