सातारा : माझ्यावर केस करून दबावाच राजकारण केलं जातं आहे. परंतु खंडोबाच्या साक्षीने सांगतो मी खोटं बोलणार नाही. केस कशी खोटी बनवायची हे सहा महिन्यापासून चालू आहे. यंत्रणेचा वापर करून चुकीची माणसे या साताऱ्यामध्ये निवडून आली. यंत्रणेचा वापर करून जबरदस्ती अधिकाऱ्यांवर जबाब टाकायचा. मी चुकीचा असतो तर पवार साहेबांनी पाठराखण केली नसती. चुकीच्या पद्धतीने आरोप करायचे काही करून हा महिने सहा महिने बाहेर आला नाही पाहिजे, हा त्यांचा डाव होता. मला उद्याही अटक करा. परंतु मी शरद पवार साहेब आणि यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा विचार सोडणार नाही. निवडणुकीत काही होऊ द्या शरद पवार साहेबांनी, यशवंतरावजी चव्हाण साहेबांना ते लोक बोलतील त्यांचा सुफडा साफ झाल्याशिवाय पर्याय नाही. असा हल्लाबोल सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी विरोधकांवर केला आहे.
शशिकांत शिंदे यांच्या प्रचाराची पहिली सभा कराड उत्तर मतदारसंघात पार पडली. या सभेतून त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजकारणात नवीन अजेंडा आलेला आहे. कोण बोलायला उभे राहिले की त्याला लगेच आत टाकायचं. रोज एक दोन लोक पत्रकार परिषद घेत असतात. बाळासाहेबांनी सांगितलं त्यावर उत्तर देऊ नका. मी तुम्हाला एवढेच सांगेल जेवढे लोक मला ओळखतात 35 – 40 वर्षाच्या राजकारणात माझ्यावर आरोप करण्याच्या बाबतीत एकही मुद्दा मिळालेला नाही. मी असेल बाळासाहेब पाटील असतील आम्हाला सुद्धा फोडण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांना माहित होतं की ही ताकतीची माणस आहेत.पण आम्ही प्रामाणिक राहिलो. असेही ते म्हणाले.
पुढे बोलतांना शशिकांत शिंदे म्हणाले की, सातारा लोकसभा मतदारसंघातून कोणी लढायला तयार नसेल तर मी उभा राहतो असं पवार साहेबांना सांगितलं होतं. त्यात माझा कोणताही स्वार्थ नव्हता. मा६ या देशामध्ये ज्या पद्धतीने हुकूमशाही आली आहे. ती नष्ट झाली पाहिजे. यशवंतराव चव्हाण साहेबांचा सातारा जिल्हा अबाधित राहिला पाहिजे. जातीयवादांच्या हातात गेला नाही पाहिजे. त्यामुळे तुमच्या आशीर्वादाने हा शशिकांत शिंदे उभा असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा…“..तर राजकारण सोडेन, “राणा जगजितसिंह पाटलांचं निंबाळकरांना खुलं आव्हान
यातच परमेश्वराची साथ ही सत्याच्या पाठीमागे असते, हा सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा कसा जिंकायचा यासाठी फोडाफोडी चालू आहे. आज खंडोबाच्या साक्षीने सांगतो, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात ताकद आहे. आजच्या घडीला विजय हा ठिकाणी निश्चित होईल. म्हणूनच समोरचा उमेदवार उभा करण्यासाठी वेळ लागला. असे म्हणत त्यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला.
मी सातारा जिल्ह्यासाठी आणि प्रत्येक तालुक्यासाठी आवाज उठवू शकतो. गावामध्ये गेल्यावर युवक, ग्रामस्थ, महिला भगिनी पुढे येऊन उत्साहाने सहभागी होत आहे आणि सांगत आहेत की आम्ही आता तुतारी वाजणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचा स्वाभिमान आहे. निवडणुकीच्या तोंडावर अरबी समुद्रात स्मारक उभारण्याचे घोषणा केली. परंतु ते उभे करू शकले नाही. तुमचा हेतू वाईट असेल तर या भागातला मावळा तुम्हाला उलथावून टाकेल. येणाऱ्या संकटाला सामोरे जाऊया, विजय हा साकार उत्तर कराड आणि पाटणच्या माध्यमातूनच होणार आहे. सातारकर हा इतिहास करून दाखवेल ‘ तुतारी फुंकणारा माणूस ‘ हे आपलं चिन्ह आहे. आपण सर्वांनी जोमाने काम करत महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही यावेळी शिंदे यांनी केले.
READ ALSO :
हेही वाचा…ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती : १९० ज्येष्ठ नागरीक संघांचा मोहोळ यांना पाठिंबा
हेही वाचा…“सर्वसामान्यांचा लक्ष वळवण्याचा मोदींचा किळसवाणा डाव”, कॉंग्रेसची मोदींवर जहरी टिका