सोलापुर : सोलापुर लोकसभा मतदारसंघातून वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्याने मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. भाजपकडून तसेच महायुतीकडून याठिकाणी आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे निवडणुकीच्या मैदानात उभा राहिल्या आहेत. मात्र राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्याने आता प्रणिती शिंदे या विजयाच्या अगदी जवळ गेल्याचे सांगितले जात आहे. यातच एमआयएमने देखील प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्याने भाजपच्या राम सातपुते यांना हा गड करणं आता अवघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा…”भोसरी मतदारसंघातून एक लाखाच्यावर लीड देणार”
सोलापुर मतदारसंघातून वंचितकडून राहुल गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. माघार घेण्याचं कारण देखील त्यानंतर सांगितलं आहे. राहुल गायकवाड म्हणाले की, मला निवडणुकीच्या रिंगणात एकटं सोडण्यात आलं होतं. माझ्याजवळ बंदूक दिली होती. मात्र त्या बंदुकीत गोळ्याच दिल्या नाहीत. अशी खंत त्यांनी व्यक्त केलीय.
हेही वाचा…” ‘गद्दार बघाओ, काँग्रेस बचाओ’चा नारा,”पुण्यात कॉंग्रेस पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंधरा दिवस मतदारसंघात फिरलो. मात्र येथील कार्यकारीणीतील नेत्यांच्या जो अनुभव आला त्यावरून आंबेडकरांचं स्वप्न पुर्ण होणार की नाही. याबाबत शंका येऊ लागली. तसेच जर याठिकाणांहून अर्धवट निवडणूक लढलो तर याठिकाणी भाजपचा नेता संसदेत जाणार आणि संविधानाला धोका निर्माण होणार त्यामुळे निवडणुकीतून माघार घेत असल्याची प्रतिक्रिया राहुल गायकवाड यांनी दिलीय.
दरम्यान, मागच्या निवडणुकीत सोलापुर लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे माजी मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी निवडणुक लढवली होती. त्याचवेळी वंचितचे प्रकाश आंबेडकर देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आंबेडकरांना यावेळी एक लाख ७० हजार मते पडल्याने सुशील शिंदे यांना पराभव स्विकारवा लागला. तर भाजपचा खासदार याठिकाणी निवडून आला. यातच आता वंचितने माघार घेतल्याने यंदाच्या निवडणुकीत सोलापुर लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणितं बदलणार असल्याची आता शक्यता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सर्वसामान्यांचा लक्ष वळवण्याचा मोदींचा किळसवाणा डाव”, कॉंग्रेसची मोदींवर जहरी टिका
हेही वाचा…“..तर राजकारण सोडेन, “राणा जगजितसिंह पाटलांचं निंबाळकरांना खुलं आव्हान
हेही वाचा…“बारामतीसाठी शेवटचे सात दिवस राखून ठेवा”, अजितदादांनी महायुतीच्या नेत्यांना दिल्या सूचना
हेही वाचा…“पहिल्या टप्प्यात भाजपची सर्वत्र पिछेहाट, त्यामुळेच भाजपा निवडणुकीत बावचळली”