मुंबई : ‘पुनश्च हरी ओम’ म्हणता अन् ‘हरी’ लाच का कोंडून ठेवता? असा सवाल मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी विचारत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच मनसेने पुन्हा एकदा मंदिराच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरलं आहे. पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता? असा सवाल त्यानी उपस्थीत यांनी केला आहे.
पुनःश्च हरी ॐ म्हणता व "हरी" ला च कोंडून ठेवता. बार उघडले, मग बार ची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव , मल्टिप्लेक्स ला परवानगी, मग कोरोना फक्त मंदिरातच होईल का? काय तर्क (Logic) असावा या मागे हे कोडेच आहे.
हा केवळ भावनेचा नाही तर— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) November 6, 2020
राज्यात बार उघडले. बारची वेळही ठरवून दिली. आता जलतरण तलाव, मल्टिप्लेक्सलाही परवानगी दिली. कोरोना काय फक्त मंदिरातच होतो काय? काय तर्क असावा या मागे हे कोडेच आहे. हा केवळ भावनेचा प्रश्न नाही तर मंदिरावर अवलंबून असणाऱ्या हजारो व्यावसायिकांच्या रोजीरोटीचाही प्रश्न आहे, असं नांदगावकरांनी म्हटलं आहे.
Read Also :
लपून उत्तर काय उत्तर देता? चर्चेला कुठेही बोलवा, मी तयार, शेलारांचं आदित्य ठाकरेंना खुलं आव्हान
रोहित पवारांच्या यशासाठी ‘मातोश्रीं’नी कसली कंबर; ‘सुनंदा पवार’ उतरल्या मैदानात
व्लादिमिर पुतीन यांना गंभीर आजार , राष्ट्रपतीपद सोडणार ?
‘कराल काय स्वतःला अटक??? न्या स्वतःला फरफटत’ , राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल