मोहरमच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीला परवानगी द्यावी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत मिरवणुकीला परवानगी नाकारली आहे. जनतेच्या आरोग्याला धोका होऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.
SC declines permission for carrying out Muharram procession across country, asks petitioner to move Allahabad HC
— Press Trust of India (@PTI_News) August 27, 2020
सरन्यायाधीश एस. एस. बोबडे यांच्या यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, आम्ही व्यापक निर्देश देऊ शकत नाही. मिरवणूक काढण्याची परवानगी दिली तर कोरोना पसरवल्याच्या नावावर एका समुदायाला दोषी धरले जाईल, जे आम्हाला होऊ द्यायचे नाही.
मिरवणुकीसाठी याचिका दाखल करणारे पक्षाचे वकील वासी हैदर यांनी गन्नाथ पुरीत रथयात्रेस परवानगी दिल्याचा मुद्दा मांडत युक्तीवाद केला. यावर न्यायालयाने म्हटले की, रथयात्रेत अॅक्सेस पॉइंट ठरवलेले होते. तुम्ही तर संपूर्ण देशभरासाठी परवानगी मागत आहात. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणी मिरवणूक काढण्याची मागणी केली, तर आम्ही उद्भभवणाऱ्या धोक्याचा विचार केला असता. निर्बंध व सावधगिरी बाळगता येईल अशी विशिष्ट जागा मोहरम जुलूससाठी नसते.
दरम्यान, याप्रकरणी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना अलहाबाद न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.